उमरगा – बहुजन हिताय विद्यार्थी वसतीगृह येथे शालेय शिक्षण झालेल्या प्रतीक बालाजी कांबळे या विद्यार्थ्यांने एम.बी.बी.एस. या वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी सन २०२४ मध्ये झालेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेमध्ये ५९४ गुण मिळवून पास झाल्याबद्दल त्याचा सत्कार संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यात बहुजन हिताय संस्थेचे अध्यक्ष महेंद्र कांबळे मुंबई हे प्रामुख्याने उपस्थित होते.त्यांच्या हस्ते प्रतीक कांबळे याचा पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी प्रतीक याच्या पालकांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. वसतिगृहातील अभ्यासपोषक साधन सुविधा आणि अधीक्षकांचे योग्य मार्गदर्शन व संस्कारक्षम वातावरण यामुळेच माझा मुलगा आज डॉक्टर होत आहे. हे सर्व येथील मार्गदर्शक शिक्षकांच्या मुळेच होऊ शकले. असे प्रतीक यांच्या आई वडिलांनी आपल्या मनोगतात सांगितले. आपल्या मनोगतामध्ये प्रतीक कांबळे म्हणाले की,मी जे यश माझ्या जीवनामध्ये प्राप्त करू शकलो ते केवळ मी वसतीगृहात घेतलेल्या संस्कारांमुळे व येथील स्वावलंबी जीवनाच्या धड्यांमुळे,येथील अभ्यासासाठी असलेल्या पोषक वातावरणामुळे व अधीक्षकांच्या प्रेमळ व प्रेरणा देणाऱ्या संस्कारयुक्त मार्गदर्शनामुळे मिळवू शकलो. येथे शिक्षण घेतल्यामुळे मोठे अधिकारी झालेल्या एमपीएससी सारख्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या व सरकारी क्षेत्रामध्ये मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या उदाहरणांमुळे मला प्रेरणा मिळाली आणि तशी संधी या वसतीगृहांनी मला दिली. वेळोवेळी मार्गदर्शन केले व त्यामुळे मी हे यश मिळवू शकलो. वस्तीगृहाचे माझ्यावर खूप उपकार आहेत हे मी कधी विसरणार नाही आणि यापुढेही मी परिश्रम घेऊन मोठे होऊन समाजाची सेवा करीन असे हृदयद्रावक मत प्रतीक याने व्यक्त केले. प्रतीक सारखे उच्च शिक्षणामध्ये प्रवेश घेण्यासाठी कठोर परिश्रम घेणारे बहुजन हिताचे अभिमान आहे संस्थेचे भूषण आहे संस्थेत संस्था करीत असलेल्या कामाचा हा परिपाक आहे संस्था यापुढेही प्रतीक सारख्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी नेहमीच सोबत राहील. त्याने यापुढेही अशीच शिक्षणामध्ये गरुड झेप घ्यावी व समाजासाठी आणि देशासाठी योगदान द्यावे, प्रतीक याच्या पुढील प्रगतीसाठी संस्थेकडून खूप खूप शुभेच्छा आहेत असे मत संस्थेचे अध्यक्ष महेंद्र कांबळे उर्फ धम्मचारी अमोघमुनी यांनी आपल्या प्रमुख मार्गदर्शन पर भाषणामध्ये व्यक्त केले. याप्रसंगी बहुजन हिताय संस्थेचे प्रकल्प प्रमुख धम्मचारी प्रज्ञाजीत,संस्थेचे पदाधिकारी धम्मचारी धम्मभूषण, ज्ञानपालित,रत्नपालीत, विबोध, जिंनघोष,जीनोदय,वगरसेन कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यास परिसरातील पालक सामाजिक कार्यकर्ते हितचिंतक आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकल्प प्रमुख धम्मचारी प्रज्ञाजीत यांनी सांगितले कि या वर्षी श्रीनिवास राठोड हा विद्यार्थी बी.ए.एम.एस पूर्ण झाला तर विद्वान कांबळे आणि स्वप्नील सूर्यवंशी हे दोन विद्यार्थी एम.पी.एस.सी परीक्षा पास झालेले आहेत.व संकेत वाघमारे हा इंजिनियरिंग चे शिक्षण पूर्ण केला आहे.
More Stories
उमरगा शहर व तालुक्यामध्ये वृक्ष लागवड
आरोग्य क्षेत्रात समाज विकास संस्थेचे कार्य उल्लेखनीय
शिवपुत्र संभाजी महाराज यांस