लातूर – पूज्य भिक्खु पय्यानंद थेरो यांच्या मार्गदर्शना खाली सुरु असलेल्या “दर रविवार चलो बुद्ध विहार” या अभियान अंतर्गत हाडोळती येथे उपाली बुध्द विहारात सामूहिक बुद्ध वंदना संपन्न झाली. आज समाजाला बौद्ध धम्माच्या शिकविणीची अत्यंत आवश्यकता आहे. प्रत्येक गावात समाजाच्या सहकार्याने बुद्ध विहाराची निर्मिती करण्यात आली आहे. या बुद्ध विहारातून समाज प्रबोधण आणि जाणीवजागृतीचे केंद्र आहे असे प्रतिपादन भिक्खु पय्यानंद थेरो यांनी धम्म देशना केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पंचरंगी धम्मध्वजाचे ध्वजारोहन करून विश्वरत्न,बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून त्रिशरण पंचशील, बुध्द वंदनेने घेण्यात आली, नंतर बावीस प्रतिज्ञा व संविधान प्रास्तविकेचे सामूहिक वाचन घेण्यात आले. यावेळी भिक्खु पय्यानंद थेरो बोलताना म्हणाले की, बुद्ध विहार हे प्रबोधन व जागृतीचे केंद्र असते. बुद्ध विहारामध्ये कर्मकांड होत नसते तर मानवाचा बौद्धिक विकास चांगल्या विचार आणि संस्कारातून होतो. विहारात आल्याने मानवाची धर्म,जात, लिंग,भेद याचा अहंकाराची भावना संपते. मनात करुणा, मैत्री व बंधुता निर्माण होते. यातूनच मानवाची उन्नत प्रगती होते म्हणूनच बुद्ध विहार हे कर्मकांड करण्याचे ठिकाण नसून जागृतीचे ठिकाण आहे. भिक्खु पय्यानंद थेरो पुढे बोलताना म्हणाले की, दर रविवार चलो बुद्ध विहार हे अभियान आता यापुढे लातूर शहरा नंतर आता पूर्ण लातूर जिल्ह्यात जाणार आहे व याचाच भाग म्हणून हाडोळती ता.अहमदपूर येथे होत असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. मंगल कांबळे, शोभा कांबळे, महानंदा कांबळे, राणी कांबळे, कोंडाबाई कांबळे, प्रमिला कांबळे,अनुराधा कांबळे ,पूजा कांबळे,मंजुळाबाई गंगाराम कांबळे, गयाबाई साळवे सत्यशीला कांबळे, सोजरबाई कांबळे, उज्वलाबाई कांबळे, भामा कांबळे, वंदना कांबळे, कुसुमबाई कांबळे, देवई कांबळे, बायनाबाई कांबळे, सोनाली कांबळे, गवळण कांबळे, कुसुमबाई कांबळे, वैशाली कांबळे, कांताबाई कांबळे, किरण कांबळे, काजल कांबळे, रंजनाबाई कांबळे, नीता कांबळे, रेवता कांबळे, शोभा सोनकांबळे, अंजली सोनकांबळे, पंचशीला बनसोडे, सरिता बनसोडे, जयश्री कांबळे, निवृत्ती कांबळे, संग्राम भोगे,अक्षय साहेबराव बोडके, अमोल सूर्यवंशी, नरसिंग कांबळे, अविनाश कांबळे ,अभय कांबळे, सुरज मारकोळे, अजय कांबळे, अरविंद कांबळे ,जगन्नाथ कांबळे, जीवक कांबळे, वैजनाथ कांबळे, गंगाधर मरिबा कांबळे, प्रदीप कांबळे ,संतोष कांबळे, निळकंठ कांबळे, उमाकांत कांबळे ,प्रा.भगवान साळवे, इंजि.सुभाष कांबळे,अशोक कांबळे,रमेश कांबळे, भीमा जाभाडे,मिलिंद कांबळे, शरद मारकोळे, सुनील कांबळे, धम्मानंद कांबळे, पी.एम कांबळे, श्रीराम कांबळे ,माधव कांबळे जावेदभाई, अनिरुद्ध बनसोडे, करण ओव्हाळ, राजू सूर्यवंशी, अशोक कांबळे, महादेव मस्के ई. सह मोठ्या संख्येने उपासक उपासकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविहार धम्म सेवक ग्रुपने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अरुण कांबळे यांनी केले. तर आभार रवी मारकोळे यांनी मानले. या वेळी अन्तेश्वर थोटे यांनी ही आपले मनोगत मांडले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद धावारे यांनी केले.
More Stories
“सदा सर्वकाळ शिक्षकांच्या अडी–अडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहिन” – शिक्षक आमदार विक्रम काळे
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना लातूर येथे अभिवादन
वृद्ध शेतकऱ्याला न्याय दिल्यामुळे उपविभागीय अधिकारी निलंगा यांचे फेसकॉम तर्फे सत्कार