बीड (बाबासाहेब शिंदे) – या वर्षी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात उत्कृष्ठ दर्जाचे खते-बयाणे मिळावे या करिता प्रशासनाने उपयोजना करावे.कारण वर्ष २०२० साली मराठवाड्यात बोगस बियाणामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते.विशेषतः बीड जिल्ह्यातील शेतकरी दुबार पेरणीमुळे प्रचंड संकटात सापडला होता. विशेषतः शेतकऱ्यांना सोयाबीनचे बियाणे उत्कृठ दर्जाचे मिळणे गरजेचे आहे व खते-बियाणे उपलब्ध असताना सुद्धा ती शेतकऱ्यांना मिळत नाहीत.काही व्यापारी खते व बियाणे एकाच वेळेस घेणे अनिवार्य करत असतात,नाहीतर युरिया सारखे खते उपलब्ध असून सुद्धा शेतकऱ्यांना देत नाहीत. याची पुढील काळात प्रशासनाने गंभीर दखल घेतली पाहिजे व बोगस खते-बियाणे विक्रीविरोधात तालुकानिहाय भरारी पथकांची पथकामार्फत दोषी विरोधात कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी,अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते तथा ज्ञानमाता माहिती अधिकार कार्यकर्ते अक्षय गोटेगावकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
More Stories
ॲड.वर्षाताई देशपांडे यांना “युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन अवॉर्ड २०२५”; न्युयॉर्कमध्ये जागतिक सन्मान
बीड येथे आडसूळ-काळे परिवाराचा विवाह सोहळा तंतोतंत वेळेत संपन्न
महाराष्ट्र सरकार “आदिशक्ती अभियान ” राबवणार – सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे