February 8, 2026

विभाजन विभीषिका स्मृती दिनाचे विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे आयोजन

  • आष्टा – भूम तालुक्यातील विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा येथे दिनांक १४ ऑगस्ट २०२५ रोजी “विभाजन विभीषिका स्मृती दिन”व संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचे ७५० वी जयंती उत्साहपूर्वक साजरा करण्यात आली.
    ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
    या वेळी शशिकांत मांजरे यांनी विद्यार्थ्यांना १९४७ मधील भारताच्या फाळणीची ऐतिहासिक व वेदनादायक पार्श्वभूमी सविस्तर उलगडून सांगितली. भारत-पाकिस्तान विभाजनामुळे झालेल्या हालअपेष्टा,विस्थापन व मानवी हक्कांचे उल्लंघन याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देत इतिहासातून एकात्मता,सौहार्द आणि समतेचे मूल्य जोपासण्याचा संदेश देण्यात आला.
    शालेय परिपाठावेळी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सामूहिक “पसायदान” म्हटले.
    कार्यक्रमाला सहशिक्षक नामदेव अंनत्रे,शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव,बबन यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
    हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची जाण व राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला.
error: Content is protected !!