बार्शी – मतदान अधिकारी हा निवडणूक आयोगाचा कणा व श्वास असून तो अधिक सक्षम झाला पाहिजे. सध्या भारत निवडणूक आयोगाच्या भारत आंतरराष्ट्रीय लोकतंत्र व निर्वाचन प्रबंध संस्था नवी दिल्ली यांच्या वतीने चार राज्यातील जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी,तहसीलदार, नायब तहसीलदार,पर्यवेक्षक,केंद्रास्तरीय मतदान अधिकारी यांच्या साठी यांच्या साठी राष्ट्रीय पातळीवर प्रशिक्षण व चर्चासत्र ११ जून ते १३ जून दरम्यान आयोजित केले होते. केंद्रास्तरीय मतदान अधिकारी यांना अधिक सक्षम करून निवडणूक आयोगाच्या बीएलओ अँप मध्ये सुधारणा करून मतदार यादी अधिक सदोष बनविणे,अँप मध्ये सुधारणा करणे या सारख्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातुन १३२ अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे मतदान अधिकारी अनिल देशपांडे यांनी तेथील सर्व चर्चासत्रात भाग घेऊन आयोगाला अनेक सुधारणा सुचविल्या या सुचविलेल्या सुविधा मुळे मतदार नोंदी अधिक अचूक व निर्दोष होणार आहेत.तसेच अनिल देशपांडे यांनी निवडणूक आयोगाच्या अँप मध्ये अनेक सकारात्मक बदल सुचविले याची आयोगाने दखल घेतली. महाराष्ट्राचे सहायक मुख्य निवडणूक अधिकारी किरण शार्दूल यांनी निवडणूक आयोगाच्या वतीने बार्शीच्या अनिल देशपांडे यांचा विशेष प्रमाणपत्र देऊन गौरव करत अनिल देशपांडे यांचे अभिनंदन केले. सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद,उपजिल्हा निवडणूक अधिकारी,बार्शीचे तहसीलदार एफ.आर.शेख,नायब तहसीलदार संजीवन मुंढे,संगणक परिचालक आकाश गुळवे यांनी अभिनंदन केले.
More Stories
कमल घोडके यांचे दुःखद निधन
तुळशीदास भीमराव शिंदे यांचे दुःखद निधन
बाळासाहेब यादव यांचा ज्ञान प्रसारक मंडळाच्या वतीने सत्कार