June 20, 2025

विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवून आपली ध्येय साध्य करावीत – सोपान पवार

  • आष्टा – विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण अभ्यासाच्या माध्यमातून आपली ध्येय साध्य करून जिद्द,चिकाटी आणि कठोर परिश्रम यांचे महत्त्व स्पष्ट करत शैक्षणिक गुणवत्तेच्या टिकावासाठी सातत्य आवश्यक असल्याचे प्रतिपादन उपक्रमशिल शिक्षक सोपान पवार यांनी केले.
    ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली भूम तालुक्यातील आष्टा येथील विद्यामंदिर हायस्कूल येथील दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन व निरोप समारंभ दि.१० फेब्रुवारी २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाला.

  • यावेळी कार्यक्रमाचे व्याख्याते म्हणून साहित्यिक सोपान पवार हे बोलत होते.पुढे बोलतानी पवार म्हणाले की,विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयाकडे एकाग्रतेने वाटचाल करावी आणि कोणत्याही अडचणींना न डगमगता प्रयत्नशील राहावे,असा सकारात्मक संदेश त्यांनी दिला.आजच्या स्पर्धात्मक युगात ज्ञानार्जन आणि त्याचा योग्य वापर करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
    या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यामंदिर हायस्कुल मुख्याध्यापक आनंद रामटेके यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून उपक्रमशिल शिक्षक सोपान पवार,भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्रा.अविनाश घोडके,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रकांत (आबा) काकडे, गावचे सरपंच सुनिल (बापू) जाधव,गटनेते तात्यासाहेब अष्टेकर,तानाजी (मामा) गिलबीले,अरुण (दादा) काकडे व जि.प.चे सहाय्यक शिक्षक सारुक,सहशिक्षिका श्रीमती जाधव,श्रीमती माळी,श्रीमती उपळकर,आदींची उपस्थिती होती.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. व गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रकाशित होत असलेल्या सा.साक्षी पावनज्योतच्या कै. रमेश (आई) मोहेकर प्रथम पुण्यस्मरण विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

  • याप्रसंगी प्रा.अविनाश घोडके हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर घडवून यश संपादन करावे.इयत्ता दहावी हा आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.त्यामुळे या टप्प्यावर योग्य दिशा निवडणे गरजेचे आहे.विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या विषयाचा नीट अभ्यास करून भविष्यातील करिअर ठरवावे आणि त्या दिशेने सातत्याने प्रयत्न करावेत.त्यांनी जिद्द,मेहनत आणि चिकाटी यांच्या जोरावर यशस्वी होऊन आपल्या आई-वडिलांचे आणि शिक्षकांचे ऋण फेडावे,असे आवाहन करत विद्यार्थ्यांच्या यशस्वी भविष्यासाठी शिक्षकांचे योगदान अनमोल असते.शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी स्थापन केलेल्या या संस्थेने शेकडो विद्यार्थी घडवले आहेत.त्यांचे आणि इथल्या शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी नेहमीच उपयोगी ठरणार आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांनी दिलेल्या शिकवणीचा आदर राखून कठोर परिश्रम घ्यावेत आणि उज्ज्वल भविष्यासाठी सज्ज व्हावे,असा मौलिक सल्ला प्रा.घोडके यांनी दिला.
  • तर अध्यक्षीय समारोप करताना मुख्याध्यापक आनंद रामटेके यांनी विद्यार्थ्यांना येणाऱ्या बोर्ड परीक्षेस आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा सल्ला दिला.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत चांगल्या गुणांनी यश मिळवावे असे आवाहन करून मेहनत,सातत्य आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीच्या आधारावर कोणतेही लक्ष्य साध्य करता येते.विद्यार्थ्यांनी तणावमुक्त राहून,नियमित अभ्यास करून परीक्षेस तयारी करावी आणि यशस्वी होण्याच्या दिशेने वाटचाल करावी.शाळेच्या शिक्षकवृंदानेही विद्यार्थ्यांना उत्तम तयारीसाठी मार्गदर्शन केले असून,त्यांचा पूर्ण आत्मविश्वास विद्यार्थ्यांवर आहे.यावेळी विद्यार्थ्यांनी मनोबल वाढवणाऱ्या या शुभेच्छा स्वीकारून परीक्षेसाठी आत्मविश्वासाने सज्ज होण्याची ग्वाही दिली.
    स्वंशासन दिनामध्ये मुख्याध्यापक -कु अंजली शेषेराव जाधव,उपमुख्याध्यापक -गणेश सोमनाथ कळकुंबे,उत्कृष्ट संघटक -ओम नवनाथ जाधव,
    शिक्षणाधिकारी -कु वैष्णवी तानाजी वाघुले व सेवक -गणेश गोकुळ माळी यांनी जबाबदारी पार पाडली.
    यावेळी ज्येष्ठ सहशिक्षिक नामदेव अनंत्रे,शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव व बबन यादव आदींची उपस्थिती होती.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी विक्रम गिलबिले यांनी केले तर आभार वैष्णवी तानाजी वाघुले यांनी आभार मानले.

error: Content is protected !!