कळंब – लासरा बॅरेजसचे भुसंपादन त्वरित करून पाणी साठा करावा यासाठी सौंदणा, लासरा,आवाड शिरपुरा गावातील शेतकऱ्यांनी अर्धनग्न डुबकी मारो आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी तात्काळ बैठक घेऊन सौदणा (अंबा) येथील थेट खरेदीचे दर निश्चित केले.व उर्वरित गावांचे अवारड करण्याची प्रक्रिया तात्काळ करण्याचे आदेश दिले.त्यानंतर प्रशासनाने कार्यवाहीची प्रक्रिया सुरू केली. याबाबत आमदार कैलास घाडगे पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन तात्काळ कार्यवाही करण्याचे सुचविले होते.सर्व प्रक्रिया पूर्ण करून पाणी साठा करण्यासाठी प्रशासनाने पंधरा दिवसाची मूदत मागितली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पंधरा दिवसाची मुदत मान्य केली आहे. परंतु पंधरा दिवसांत जर प्रक्रिया पूर्ण करून पाणी साठा केला नाही तर परत बेमुदत अर्धनग्न डुबकी मारो आंदोलन करण्याचा इशारा लेखी दिला आहे.
More Stories
छत्रपती शिवाजी महाराज चौकात अतिक्रमणावर बुलडोझर;नगरपालिकेची धडक मोहीम सुरू
रॉकेल वाटपाचा मोठा निर्णय; आता एका रेशन कार्डवर ३ लिटरच मिळणार!
“मोठ्या महादेवाचा मार्ग धोक्यात!” — पुरात वाहून गेला रस्ता-पूल; चैत्र एकादशीपूर्वी दुरुस्तीची शिवभक्तांची आर्त मागणी