धाराशिव (जिमाका) – भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुर्नरीक्षण कार्यक्रम घोषीत करण्यात आला आहे.त्यायानुसार 2 ऑगस्ट रोजी प्रारुप मतदार यादी सर्व मतदान केंद्र,तहसिल कार्यालय,उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच सर्व पदनिर्देशित ठिकाणी प्रसिध्द करण्यात आली आहे.यावर आता दावे हरकती स्विकारण्यास सुरुवात झाली आहे.
6 ऑगस्टपासुन ते 20 ऑगस्टपर्यंत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत.यामध्ये नागरिकांकडून मतदार नोंदणीचे,मतदार यादीमधील दुरुस्ती तसेच नाव वगळणीचे अर्ज मागविण्यात येत आहेत.याच कालावधीमध्ये मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेले दोन शनिवार व रविवार या दिवशी विशेष मोहिमांचा कालावधी असणार आहे.
29 ऑगस्ट रोजी दावे,हरकती निकालात काढणे,अंतिम प्रसिध्दीस आयोगाची परवानगी घेणे,डाटाबेस अद्यायवत करणे आदी कार्यक्रम आहेत.यानंतर 30 ऑगस्ट रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार आहे.
नागरिकांनी आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवून घ्यावे.त्याचबरोबर मतदार यादीत नाव असल्याची खात्री करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओंम्बांसे यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला