June 19, 2025

संताच्या वास्तव विचारांची पेरणी करावी – प्रा.उल्हास पाटील

  • प्रा.अर्जुन जाधव यांच्या बळी आत्मचरित्र ग्रंथाचे शानदार विमोचन
  • लातूर (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा) – प्रा.अर्जुन जाधव यांनी आत्मचरित्र ग्रंथातून वास्तव जीवनाची सांगड घालून बळीचे वास्तव मांडले आहे. अगदी त्याच पद्धतीने वारकरी सांप्रदायानी सुद्धा आपल्या कीर्तन,प्रवचनातून संत महात्म्यांच्या वास्तव विचारांची प्रेरणी करावी असे आवाहन गाथा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष प्रा.उल्हास पाटील यांनी ग्रंथ प्रकाशन आणि अमृत महोत्सवाच्या अध्यक्षीय भाषणातून केले.
  • प्रा.अर्जुन जाधव यांच्या बळी या आत्मचरित्र ग्रंथाचे विमोचन व बहीण श्रीमती सुभद्राबाई भागवत तांबे महाराज आळणीकर यांचा अमृत महोत्सव सोहळा दिनांक १५ जून २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता थोरमोटे मंगल कार्यालय,औसा रोड लातूर येथे प्रचंड उत्साहात शेकडो विचारवंतांच्या साक्षीने शानदार असा संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गाथा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष प्रा. उल्हास पाटील,संगमनेर तर विमोचक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शेषराव मोहिते,प्रमुख पाहुणे सत्यशोधक समाजाचे के.ई.हरिदास आणि सिंदखेडराजा येथील लखोजी जाधव यांचे वंशज भास्करराजे जाधव,इंजि.तुकाराम मचे,नगर,ह.भ.प महादेव महाराज तांबे आळणीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
    प्रा.अर्जुन जाधव यांनी महात्मा बसेश्वर,संत तुकाराम,माता जिजाऊ,महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती राजश्री शाहू महाराज, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांच्या विचारांचा आणि कार्यकर्तृत्वाचा धावता आढावा विषद करून थोरली बहीण श्रीमती सुभद्राबाई भागवत तांबे महाराज यांचे वयाच्या दहाव्या वर्षी लग्न झाले तर पंधराव्या वर्षी वैधव्याच्या काटेरी जीवन प्रवासीची ७७ वर्षे पूर्ण केली असल्याने त्यांचा अमृत महोत्सवीनिमित्त सन्मान करून स्त्री-पुरुष विषमतेला गाढण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रस्तावनेतून सांगितले. सत्यशोधक समाजाचे के.ई.हरिदास,ज्येष्ठ साहित्यिक डॉ.शेषराव मोहिते, लखोजी जाधव यांचे वंशज भास्कर राजे जाधव यांनीही आपले परखड आणि अभ्यासू विचार मांडले. कार्यक्रमाचे भारदस्त असे सुत्रसंचालन अंनिसच्या रुकसाना मुल्ला यांनी केले तर डॉ.नीलम जाधव- पन्नाळे यांनी आभार व्यक्त केले.सामुदायिक राष्ट्रगीत घेऊन स्वादिष्ट अशा स्नेह भोजनानी या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
error: Content is protected !!