June 20, 2025

ज्ञान प्रसार विद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

  • मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.
    याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप होते तर ज्ञान प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ संचालक तात्यासाहेब पाटील तसेच प्रशासकीय अधिकारी रमेशभाऊ मोहेकर यांची कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करुन दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. देवदत्त पाटील यांनी केले. याप्रसंगी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये धनश्री वीर, ज्योती सातपुते,श्रेया मडके,श्रुती इंगळे,राणी मडके,मुस्कान शेख, राजनंदिनी माळी,बुशरा काझी, आदिती साळुंखे तसेच सुहानी कसबे या विद्यार्थिनींनी आपली कला सादर केली.निरोप समारंभामध्ये आपले मनोगत व्यक्त करताना संस्कृती मडके, समिक्षा मडके,आलिया पठाण, राजनंदिनी कसबे,मीरा गिरी या विद्यार्थिनी अतिशय भाऊक झाल्या तर राजनंदिनी माळी, दिक्षा मडके,धनश्री वीर,मुस्कान शेख,प्रियंका जाधव,रोहन जाधव,विवेकानंद लाड या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
    प्रा.नवनाथ करंजकर,प्रा.विठ्ठल जाधव,प्रा.शेखर गिरी,प्रा. दिग्विजय पाटील, प्रा.राहुल भिसे, प्रा.प्रतिभा सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळातील स्पर्धेची जाणीव करून दिली. सहशिक्षक सतीश मडके यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
    अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य संजय जगताप यांनी विद्यार्थ्यांसाठी हा निरोप समारंभ म्हणजे एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे.विद्यार्थ्यांनी परीक्षेला अतिशय आत्मविश्वासाने सामोरे जाऊन उत्तुंग यशाची भरारी घ्यावी असे विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नर्गिस पठाण या विद्यार्थिनीने केले तर आभार प्रदर्शन आदिती साळुंखे या विद्यार्थीनीने केले
    कार्यक्रमाला सहशिक्षक संजय आडणे,क्रीडा शिक्षक संजय मडके,श्रीमती उषा पांचाळ, जनार्दन भामरे,मंगलदास पवार, अमरसिंह पाटील यांची विशेष उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.अमित जाधव, प्रा.रोहित मोहेकर,अमित कुमार शर्मा,धनंजय परजणे,प्रथमेश साडेकर,ज्ञानोबा टोपे तसेच विष्णू जाधव यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!