महाराष्ट्र राज्याच्या ०१ मे २०२५ साव्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा जय महाराष्ट्र.! बलसागर भारत होवो विश्वात शोधून राहो..याच मातीनं क्रांतिसूर्य दिला.! डॉ.भीमराव तथा बाबासाहेब आंबेडकर!. कामगार तो कामगारच ! मग तो कुठल्याही जात, भाषा,पंथ, धर्म प्रदेशाचा असो…!! कामगारांचे जाणता नेते आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ.भीमराव तथा बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव शुक्रता-यासारखं अढळ आहे.मुक्तीदात्यांनी कायदामंत्री असताना कामगारांसाठी केलेल्या कार्यावर एक नजर जरी फिरविली तरी डोळे उघडतील. ! काही पूर्वग्रहदूषित जे प्रश्न करीत असतात.. आंबेडकरांनी आमच्यासाठी काय केलं..? त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणायला देखिल लाज वाटते…जिभ झिजते त्यांची ! झोपलेल्यांना जागे करता येते. पण झोपेचं सोंग करतात त्यांचे काय…? “जगातील कामगारांनो एक व्हा…!” अशी कार्ल मार्क्सने डरकाळी फोडली. आपल्या देशातही जार्ज फर्नांडिस,काॅम्रेड डांगे, दत्ता सामंत,बाबा आढाव, दादा सामंत,राव,यांच्यासारखे कामगार नेते उदयाला आले.लोकशाहिर अण्णाभाऊ साठे,अमर शेख, पद्मश्री नारायणदादा सुर्वे यांनी लाला बावटा हाती धरला.इंटक,स्थानिक लोकाधिकार समिती,यांनी श्रमिकांच्या भाळावरचा जाहिरनामा मांडला.पण कामगारांच्या संवेदना, कामगारांना एक होण्यासाठी भारतात संविधानाच्या चौकटीत अर्थात कायदेशीर मार्ग प्रज्ञासूर्य भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनाच करावा लागला ! कार्ल मार्क्स अन् डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दोघेही दिग्गज. पण योगदान कालानुरूप भिन्न.आपल्या भारत देशापुरता विचार करायचा झाल्यास कामगारांचे सच्चे मसिहा कामगारांचे, शोषितांच्या वेदना मूकनायक म्हणून बोलके करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर होय! भावांनो, डॉ.बाबासाहेबांचे कामगारविषयक योगदान वाचण्याची,मनापासून समजून घेण्याची मानसिकता असेल तरच हे शक्य आहे.! त्यांच्याकडे ‘दलितांचे उद्धारकर्ते’ या संकुचित मानसीकतेतून बघू नका. येथील व्यवस्थेने त्यांच्या कामगारविषयक योगदानाला संविधान शिल्पकाराला जातीच्या भिंतीत कोंडून ठेवले.ही खंत महाराष्ट्र वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला आम्हाला सतावते.विशेष म्हणजे स्वतःला कामगारांचे नेते असे बिरूद लावणारांनीही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत तेच केले…! तरीही आज जागतिक कामगार दिनाच्या निमित्ताने मानवी मुक्तीचे प्रणेते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण केल्याशिवाय कामगार दिनाच्या दिल्या जाणाऱ्या,घेतल्या जाणा-या शुभेच्छा केवळ उपचार वाटतात.कारण कामगारांचे कामाचे तास बारा वरून आठ तास केले.महिलांना भर पगारी प्रसूती रजा लागू केली.पीएफ योजना शासकीय निमशासकीय सर्व कामगारांना लागू केली. भर पगारी सुट्टीची तरतूद केली.वेठबिगारी हटवण्यासाठी कायदा केला.बालकांना विकू द्या म्हणून बालमजुरी कायदा आणला.वेतन आयोग लागू केला. पेन्शन योजना लागू केली. सी एल /इ एल/पी एच एल सर्वाना लागू केली. कामगारांचा मृत्यू झाल्यास त्या जागेवर वारसास नोकरीची तरतूद केली. कामगारांना आठवड्यातून एकदा सुट्टी मिळावी अशी तरतूद केली.* *देशाच्या प्रगतीसाठी घाम गाळणा-या कामगारांना जागतिक कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा !* *कामगारांनों जागे व्हा …!* *दुनिया बदल रही है ! देशही बदल रहा है!* *जय संविधान !!* *जय भारत !!!* *@ समाजभूषण तात्यासाहेब सोनवणे,महाराष्ट्र शासन! +९३२४३६६७०९
More Stories
ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो! मेट्रो लाईन-9 च्या पहिल्या टप्प्याच्या ट्रायल रनला सुरुवात
जिल्हा परिषद ठाणे येथे महाराष्ट्र दिन साजरा
संघटन चळवळीतील वटवृक्ष ग.दि.कुलथे अनंतात विलीन