महाराज,आज हे पत्र आवर्जून आपल्या सेवेत विनम्रपणे समर्पित करतो आहे. गेली साडे तीनशे वर्ष झाले.इतक्या प्रदीर्घ कालखंडानंतरही आज प्रत्येक माणसांच्या श्वासासोबत तुम्ही आम्हा बहूजनांच्या,मावळ्यांच्या रोमा रोमा मध्ये संचारत आहात. रयतेसाठी,शिवसम्राज्यासाठी, आपण केलेलं बलिदान आजही आपल्या साम्राज्याची साक्ष देत आहे. अजरामर झालेला आपल्या रक्ताचा थेंब ना थेंब ईथल्या माय भूमीमध्ये पुन्हा पुन्हा रोमांकित होतो आहे.अंकुरतो आहे.फुलतो आहे…….फक्त शंभूराजे म्हटलं तरी अंग अंग शहारते आहे…… डोळ्याच्या कडान कडा आपसूक ओलावतात……..आणि स्पुरन चढते…….बाहुबलात रक्त सळसळते……. मुठी ओळल्या जातात…… कंठातून आकाशाला गवसनी घालणारा बुलंद आवाज बाहेर पडतो…….. छत्रपती संभाजी महाराज की जय ssss जय ssss जय!!!!!! महाराज आपल्या जयघोषाने आंबरात आवाज निनादतो आहे….. महाराज नक्की सांगायला अभिमान वाटतो.आज ज्या औरंग्यानं इथल्या फितूराना बरोबर घेऊन आपली हत्या केली. त्याच औरंग्याचे थडगं इथल्या मातीत शरमेन झुकलं आहे….. नुसतं झुकलंच नाही तर ते आपणास,राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज,यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या प्रत्येक गडकिल्ल्यास नतमस्तक होऊन शिरमेंदही झालं आहे…..
मराठ्यांचे साम्राज्य नेस्तनाबूत करतो.अशी शपथ घेतलेला औरंगजेब तो याच मातीतून परत गेलाचं नाही. आणि परतही जाऊ दिला नाही. ह्या मराठ्यांच्या शिवसम्राज्याने औरंग्याचे अस्तित्व समाप्त केलं.आता तेच थडग चुकीची क्षमा मागत आहे राजे …, याचना करत आहे.त्यालाही आज चुकीसाठी क्षमा मागायची इच्छा झालीय ….. राजे आपल्या माहितीसाठी नक्की सांगायला मला आवडेल.स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज या नावाची घोषणा केली होती…. आज तेही अस्तित्वात नाहीत…. परंतु त्यांची आठवण आल्या वाचून रहात नाही.आज औरंगजेबचे नामोनिशान मिटल आहे…. आणि त्याच जिल्ह्याला, शहराला छत्रपती संभाजी नगर असे म्हणजे आपले नाव दिलं आहे. त्यानंतर आज एक एक वर्ष स्मृतिदिन आम्ही आपल्या आठवणीत पूर्ण जगभर साजरा करत आहोत. महाराज सांगायला अभिमान वाटतो.आज प्रत्येक घराघरावरती आपल्या स्मृतीची,आपल्या त्यागाची आठवण म्हणून भगवा झेंडा आकाशाला गवसणी घालतो आहे.उभा हिंदुस्तान भगवामय झालेला आहे….. आपला विचार,आपला त्याग, आमच्या रोमारोमा मध्ये भिनला आहे.आज गड किल्लेही छत्रपती संभाजी महाराज की जय ची घोषणा देत आहेत….. ते आपल्या कार्याची,अस्तित्वाची साक्ष देत आहेत……. राजे आपल्या त्यागाची, बलिदानाची निशाणी अजरामर झाली…
राजे आपण दिलेले बलिदान व्यर्थ गेललं नाही…….तर ते अजरामर झालं ….
More Stories
उमरगा शहर व तालुक्यामध्ये वृक्ष लागवड
आरोग्य क्षेत्रात समाज विकास संस्थेचे कार्य उल्लेखनीय
मारुती बनसोडे यांना भीमपुत्र आयडॉल २०२५ पुरस्कार जाहीर