June 21, 2025

पाच दिवसीय धम्म संस्कार प्रशिक्षण शिबिरास सुरुवात

  • लातूर – तथागत भगवान बुद्धाने मानवतेची सदाचरणाची शिकवण संपूर्ण जगाला दिली.सर्वच बौद्ध राष्ट्रांनी बौद्ध संस्कृती पारंपारिक पणे आपल्या देशात हजारो वर्षांपासून रुजवली आहे. धम्माचे गांभीर्य महत्व वृद्धी आणि जतन व जोपासना प्रांजळ व स्वाभिमानाने जागतिक बौद्ध करताना दिसून येतात.प्रत्येक बौद्ध देशांची बुद्ध वंदना पूजापाठ वेशभूषा उपोसथ कम्म ध्यान विपश्यना धम्म अभ्यास आणि ज्ञान यामध्ये एक वाक्यता व साम्यता आहे. बुद्धाचा विचार हा भारतात आणि जगात प्रसारित झाला आहे.बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या आधुनिक काळात महामानव बुद्धांचा विचार राजा सम्राट अशोकाचे अनुकरण करीत लयास गेलेल्या बौद्ध संस्कृतीचे बीजारोपण सन १९५६ साली नागपूरला केले. तेव्हा समाजात धम्माबद्दल अभ्यास ध्यान विपश्यना वंदना पूजापाठ सूत्रपटन, धम्माचरण या सर्वांमध्ये मोठा फरक दिसून येतो. धम्म जागृती व त्याद्वारे प्रत्यक्ष धम्माचा प्रसार, खरे आचरणशील बौद्ध बनविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न लातूर शहरात संस्कार शिबिर आयोजित करूण पु.भिक्खु पय्यानंद थेरो यांच्या मार्गदर्शना खाली दि. १४ सप्टेंबर पासून ते १८ सप्टेंबर २०२४ पर्यंत पाच दिवसांकरिता धम्म प्रशिक्षण दिले जाणार आहे. दररोज सकाळी आठ ते सायंकाळी साढे सहा वाजेपर्यंत धम्मप्रशिक्षण आणि भिक्खू – भिक्खुणी आणि बौद्ध विद्वानांद्वारे सतत वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.
    शिबिराच्या सुरुवातीस महामानवांच्या प्रतिमेचे पुष्पाने धूपाने तथा दीपाने पुजन करण्यात आले. त्रिरत्न वंदने नंतर शिबिराचि सुरुवात झाली.
    कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी केशव कांबळे, उदय सोनवणे असितकुमार कांबळे,अनिरुद्ध बनसोडे, करण ओहळ, सचिन सुरवसे,मिलिंद धावारे,भरत कांबळे आदींनी प्रयत्न केले.
error: Content is protected !!