धाराशिव (जिमाका) – गणेशात्सव काळात जिल्हयात सर्व ठिकाणी सार्वजनिक शांतता अबाधित राहावी यासाठी मुंबई दारुबंदी कायदा कलमान्वये मद्यविक्री बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.जिल्हाधिकारी डॉ.ओंम्बासे यांनी दिलेल्या आदेशात ७ सप्टेंबर १०१४ रोजी श्रीगणेश आगमन (श्री गणेश मूर्तीची स्थापना ) होत असल्याने यादिवशी जिल्हयात सर्व ठिकाणी सार्वजनिक शांतता अबाधित रहावी याकरिता मुंबई दारुबंदी कायदयामधील कलमाच्या अधिकाराचा वापर करून जिल्हयातील सर्व प्रकारच्या किरकोळ देशी व विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या व ताडी विक्री अनुज्ञप्त्या ७ सप्टेंबर २०२४ रोजी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.सर्व संबंधित अनुज्ञप्तीधारकांनी या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे.अनथा आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुध्द कायद्यातील तरतूदीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल,असेही आदेशात म्हटले आहे.
More Stories
निवडणुकीत ७ लक्ष ४७ हजार ३७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक