राष्ट्रवादीच्या महामेळाव्यास धाराशिव जिल्हा महिलाध्यक्ष खोसे सह राज्यातील बहुतांश कार्यकर्त्यांची उपस्थिती
बारामती – मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजनेतून राज्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. रक्षाबंधनाच्या काळात बँकेच्या खात्यावर दोन महिन्यांचे तीन हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. बारामतीचा विचार केल्यास बारामतीमध्ये साधारण वर्षाला १८० कोटींची रक्कम मिळणार आहे, तर सगळ्या राज्यात एकूण ४६ हजार कोटींची रक्कम मिळणार आहे. महिला भगिनी आत्मनिर्भर व्हावी, यासाठी त्यांना प्रतिवर्ष १८ हजार रुपये देण्याचे काम महायुतीच्या माध्यमातून होत आहे. यात सातत्यपणा टिकवायचा आहे. त्यामुळे विधानसभेतही महायुतीला निवडून द्यायचे आहे, तरच पुढे ही योजना चालणार आहे, महिला भगिनींना कायमचे पैसे मिळणार आहेत. हौसे, नवशे गवशे येतील, काही सांगायचा प्रयत्न करतील, पण अजित पवार शब्दाचा पक्का आहे. तो बदलणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारच्या योजनांचे निर्णय सांगत, विधानसभा निवडणुकीत महायुतीला निवडून देण्याचे आवाहन करीत विधानसभेचे रणशिंग फुंकले. बारामती येथे आयोजित राष्ट्रवादी जनसन्मान महामेळाव्याच्या जाहीर सभेत पवार बोलत होते. पवार म्हणाले, जनसन्मान रॅली विधानसभेचे मतदान होईपर्यंत थांबणार नाही. आमची शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा आहे. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले. इंदू मिलच्या जागेवर डॉ. आंबेडकर यांच्या चांगल्या स्मारकाचे काम होत आहे. शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात काम करताना कुठल्याही जातीधर्माच्या व्यक्तीवर अन्याय होणार नाही, सर्वसामान्यांसाठी झाला पाहिजे. डॉ.आंबेडकरांच्या घटनेला जीवात जीव आहे, तोपर्यंत कोणी धक्का लावणार नाही. चंद्र-सूर्य जोपर्यंत आहे, तोपर्यंत संविधानाला धक्का लावू शकत नाही, विश्वास ठेवा. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. जो वादा करतो, तो पुरा करतो, ते सर्वांना माहिती आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी मंत्री बाबा सिद्दीकी, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह काही पदाधिकारी यांची भाषणे झाली. कार्यक्रमास खासदार प्रफुल पटेल, सुनील तटकरे, सुनेत्रा पवार, मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, आमदार दत्तात्रय भरणे, मंत्री हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, आमदार दत्तात्रय भरणे, अमोल मिटकरी, शिवाजीराव गर्जे, राजेश वीटकर, सूरज चव्हाण, पार्थ पवार, जय पवार आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी आभार मानले. ह्या मेळाव्यात धाराशिव जिल्हाध्यक्ष सरला खोसे -पाटील,कळंब तालुकाध्यक्ष सौ.ज्योती खंदारे,शहराध्यक्ष शाही मणियार आदींची उपस्थिती.
More Stories
घर घर माहितीचा अधिकार कायदा पोहचवा – अब्राहम आढाव
ऑल इंडिया संपादक संघ बारामती नूतन कार्यकारणी घोषित
२८ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा करावा-स्वप्निल कांबळे