June 22, 2025

पंढरीच्या वाटेवरील कळंब येथील अन्नदाते बंडोपंत (बापु) दशरथ

  • कळंब ( माधवसिंग राजपूत ) – आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्रातील एक लोक उत्सव असतो.ही परंपरा शेकडो वर्षापासून सुरू असून यात साधू संतांचे मठ,मंदिर संस्थान ,ट्रस्ट पांडुरंगाच्या दरबारी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आपली हजेरी लावण्यासाठी पायी दिंडी घेऊन जातात.यासाठी त्यांचे नियोजन असते स्वतंत्र व्यवस्था असते त्याचप्रमाणे पंढरीच्या वाटेवरील या वारकऱ्यांची सेवा करण्याची परंपरा ही आहे यातील कळंब येथील दशरथ परिवार आहे. या परिवाराच्या तीन पिढ्या अन्नदानाच्या सेवेत आहेत. ही सेवा गेली ७८ वर्ष अखंड सुरू आहे. आज बंडोपंत (बापू ) दशरथ,ज्येष्ठ चिरंजीव पंडित दशरथ कुटुंब याचे दोन महिने आधी नियोजन करून पंधरा दिवस आपला व्यवसाय बंद ठेवून वारकऱ्यांसाठी कळंब येथे अन्नछत्र चालवतात.शहरात आलेला वारकरी भोजन केल्याशिवाय पुढे जात नाहीत. यामुळे बंडोपंत (बापू) दशरथ यांची अन्नदाते म्हणून वारकरी भक्तात ओळख निर्माण झाली आहे.अन्नछत्राच्या ठिकाणी शेकडो कि.मी.पायी चालून नागपूर ,वाशिम ,अमरावती, बैतुल, (मध्य प्रदेश ) छिंदवाडा ( मध्य प्रदेश) परभणी येथील ४५ दिंड्यांचा यात समावेश आहे. दिंडी संस्थांकडून दिंडीच्या आगमनाची तारीख,वेळ व वारकऱ्यांची संख्या कळविली जाते यानुसार भोजन व्यवस्था तसेच मुक्कामाच्या ठिकाणी निवास,विद्युत,पाणी याची व्यवस्था करण्याचं कामही लक्ष देऊन केल जातं.यासाठी बापू स्वतःच्या शेतामध्ये ज्वारी पेरणी करतात या भोजनामध्ये ज्वारीची भाकरी पिठलं ,भाकरी, जवसाची चटणी, लोणचं यांचा समावेश असतो त्याचबरोबर साधू ” संत येती घरा तोची दिवाळी दसरा ” या वचनाप्रमाणे दशरथ कुटुंबीयांकडून पालखीचे स्वागत पूजा व आरती केली जाते दिंडीतील व्यवस्थापक तसेच मानकरी यांचा आदर सत्कार केला जातो यासाठी शहरातील काही भक्त वारकऱ्यांना भोजन वाढण्यासाठी मदत सेवा देतात बापूंच्या या प्रेरणादायी कार्यामुळे कळंब शहरात भावी भक्त व समाजसेवी संस्था वारकऱ्यांची सेवा व अन्नदानासाठी पुढे येत असून शहरात सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
error: Content is protected !!