August 9, 2025

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा गरजू व्यक्तींनी लाभ घ्यावा

  • धाराशिव (जिमाका) – “मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम” हा राज्य शासनाचा महत्वकांक्षी कार्यक्रम आहे.या योजनेतून सुशिक्षित बेरोजगारांना उ‌द्योग व्यवसायासाठी महाराष्ट्र शासनातर्फे अर्थसहाय्य करण्यात येते.उत्पादन उ‌द्योगासाठी 50 लाख व सेवा उ‌द्योगासाठी 20 लाखापर्यंत कर्ज मर्यादा आहे.या योजनेअंतर्गत पुरुषांसाठी 15 टक्के ते 25 टक्केपर्यंत व महिलांसाठी 25 टक्के ते 35 टक्केपर्यंत अनुदानाची मर्यादा आहे.
    सन 2024-25 साठी जिल्हा उ‌द्योग केंद्रास 800 कर्ज प्रस्तावांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.तरी इच्छूक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://maha-cmegp.gov.in/ या संकेतस्थळास भेट द्यावी. जिल्ह्यातील सर्व गरजू व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा.अधिक माहितीसाठी जिल्हा उ‌द्योग केंद्र, धाराशिव येथे संपर्क साधावा.असे आवाहन जिल्हा उ‌द्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.
error: Content is protected !!