येरमाळा (परमेश्वर खडबडे ) – सध्या देशात लोकसभा निवडणुक सुरळीतपणे पार पडत आहे.महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात दि.७ मे २०२४ रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. येरमाळा येथील दिव्यांग मतदार तुकाराम अंगत जाधव यांचे मतदान हे देवधानोरा यश गावात होते. मतदानासाठी पोस्टल मतदान कर्मचारी हे त्यांच्या येरमाळा येथील घरी येऊन दिव्यांग व वय वृद्ध व्यक्तीसाठी खूप मोलाचे सहकार्य करीत मतदानाचा लाभ मिळवून दिला. या प्रकाराबद्दल सर्व दिव्यांग व वृद्धाकडून निडणूक अधिकारी जिल्हाधिकारी ओम्बासे यांचे खूप खूप अभिनंदन करीत आहेत.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी