मांडवा ( सुदर्शन देशमुख ) – धाराशिव जिल्ह्यातील मांडवा गावातील अतिक्रमण काढण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचा प्रकार समोर आला आहे . या गावा मध्ये अनाधिकृत बांधकाम केले आहे, तसेच बस सँड वरील असलेल अतिक्रमण तसेच ग्रामपंचायती हद्दीतील दुकाने, टपर्या , हॉटेल, गाळेधारक , तसेच अन्य भाडेधारक या सर्व गोष्टी मुळे वाहनांना होणारा अडथळा, वाहतुकीमुळे होणारी गर्दी त्यामुळे नागरिकांना होणारा त्रासाची दखल ग्रामपंचायत सरपंच , ग्रामसेवक यांनी तात्काळ या कडे लक्ष देवून नागरीकांचे प्रश्न मार्गी लावावे . मांडवा गावातील हे अतिक्रमण हे कायमच राहील की ग्रामसेवक या प्रश्नाला मार्ग काढतील या कडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष वेधले आहे .
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन