कंडारी (शंकर घोगरे ) – मराठा आरक्षणासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे दि.२० जाने २०२४ रोजी पासून लाखो मराठ्यांची फौज घेऊन मुंबईकडे निघाले आहेत.त्यांच्या आवाहनानुसार कंडारी तालुका परंडा येथून दि.२२ रोजी दोन फोर व्हीलर गाड्यां भरून मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.पहील्या टिम मधील २० बांधवांसह महिनाभर पुरेल एवढे अन्नसाठा सोबत घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे.प्रथम ग्रामदैवत काळभैरवनाथाचे दर्शन घेऊन सरकारला मराठा आरक्षण देण्याची सुबुद्धी देऊ असे साकडे घातले.या वेळी गावातील माहीला पुरुष उपस्थीत होते. तर कंडारीतील दुसरी टीम दि.२५ रोजी मुंबईकडे जाणार असून लोक वर्गणी गोळा करून मुंबई वारीचा डिझेल पाण्याचा खर्च करण्यात येणार आहे.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड