कळंब —आजच्या राजकीय परिस्थितीत ईव्हीएममुळे होत असलेली लोकशाहीची पायमल्ली रोखण्यासाठी EVM हटाव – लोकतंत्र बचाव या अभियानांतर्गत धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान (म. रा.)चे संस्थापक अध्यक्ष बाळराजे (दादा) आवारे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १६ जानेवारी २०२६ पासून ग्रामपंचायत कार्यालय तांदुळवाडी, ता.कळंब,जि.धाराशिव येथे अमरण उपोषण सुरू आहे. या लोकशाहीसाठीच्या लढ्यास कळंब तालुक्यातील अखिल भारतीय बौद्ध महासभा व मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघ,शाखा कळंब यांच्या वतीने उपोषणस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन जाहीर पाठिंबा देण्यात आला. याप्रसंगी अखिल भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण धावारे,तसेच सी.आर.घाडगे, मारुती गायकवाड,गौतम वाघमारे, सुरेंद्र शीलवंत,भास्कर सोनवणे, अर्जुन ताकपीरे,श्रीधर सावंत व जोगदंड आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी लोकशाही अबाधित राखण्यासाठी ईव्हीएम हटाव ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
More Stories
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
हुंडा प्रतिबंध व कौटुंबिक हिंसाचार जनजागृती काळाची गरज- ॲड.प्रियंका जाधव
कळंब–ढोकी परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार