मुंबई – महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने जमिनीच्या हिस्से वाटपासाठीची मोजणी फक्त 200 रुपयांमध्ये केली जाणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता शेतीसंबंधित जमिनीच्या मोजणीसाठी मोठा खर्च करावा लागणार नाही.एकत्र कुटुंबाच्या जमिनींची नोंदणीकृत वाटणी पत्रे व अधिकृत नकाशे मिळवणे आता अधिक सुलभ आणि स्वस्त झाले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची अधिकृत विभागणी करण्यात आणि नोंदणी प्रक्रियेत मोठा फायदा होणार आहे. महसूल खात्याच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
More Stories
महाराष्ट्रात गेमिंग व क्रिएटर इकॉनॉमीला चालना;डिजिटल पायाभूत सुविधांवर भर — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
“स्थगिती नसताना शेतकऱ्यांचे पैसे का अडवले?” – २०२० च्या पीकविम्यावर आमदार कैलास पाटील विधानसभेत आक्रमक
१७ ते २० मार्चदरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा;शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी – कृषी विभागाचे आवाहन