June 20, 2025

भूमिहीनांना १०० टक्के अनुदानावर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी विक्री प्रस्ताव मागविले

  • धाराशिव (जिमाका)- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील भूमिहीन कुटुंबांना १०० टक्के अनुदानावर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना राज्यात सन २००४-०५ पासून राबवली जात आहे.या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना चार एकर कोरडवाहू किंवा दोन एकर बागायती जमीन शासनाच्या खर्चाने उपलब्ध करून दिली जाते.
    या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील भूमिहीन कुटुंबांना जमीन वाटप करता यावी,यासाठी जिल्हा प्रशासनाने जमीन विक्रीस इच्छुक शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागविले आहेत.सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,बाबासाहेब अरवत यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. जमीन विक्रीस इच्छुक शेतकऱ्यांनी शासनाच्या ठरवलेल्या दरानुसार पुढील कागदपत्रांसह आपला प्रस्ताव सादर करावा.
    विहीत नमुन्यातील अर्ज,७/१२ उतारा व तलाठ्याचे कोणताही बोजा नसल्याचे प्रमाणपत्र,प्राथमिक सहकारी सेवा सोसायटी व कृषी बँकेचे थकबाकी नसल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र,मोजणी विभागाचा नकाशासह क्षेत्रफळ अहवाल, जमिनीच्या खरेदीबाबत कोणताही वाद नसल्याचे शपथपत्र,प्रस्ताव बंधनकारक नसल्याचे घोषणापत्र, कुटुंबातील किमान दोन सदस्यांची सहमती व स्वाक्षऱ्यांसह ना-हरकत प्रमाणपत्र,शासनाच्या या उपक्रमामुळे भूमिहीनांना आर्थिक सबलीकरणाची संधी उपलब्ध होणार असून,इच्छुक शेतकऱ्यांनी आपल्या प्रस्तावांसह वरील कागदपत्रांसह समाज कल्याण कार्यालय,धाराशिव येथे लवकरात लवकर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
error: Content is protected !!