कल्याण – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या १३४ व्या आणि महात्मा जोतीबा फुले यांच्या १९८ व्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन चिंचपाडा रोड, कल्याण (पूर्व) येथे दिनांक २६/०४/२०२५ रोजी संध्याकाळी करण्यात आले. सदर प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून आंबेडकर चळवळीचे अग्रणी साहित्यीक तसेच कामगार नेते शामदादा गायकवाड, कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात काश्मिर मध्ये दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्याना श्रध्दाजंली अपर्ण करुन करण्यात आली.याप्रसंगी आपल्या भाषणातून शामदादा यांनी देशात जे गोरगरीब लोकांना वेठीस धरुन दलितांचे मुडदे पाडतात ते सुध्दा अतिरेकीच आहेत. सिमेपलीकडचा दहशतवाद आणि देशांतर्गत गोरगरीबांवर हल्ले करुन त्यांची जीवन यात्रा संपविणे,हे दोन्ही सारखेच आहेत.संविधान बचावासाठी देशातील सर्व लोकांनी एकत्र येऊन मुकाबला करणे आवश्यक आहे.तरच या देशातील गोरगरीब जनता सुरक्षीत राहिल असे त्यांनी आपल्या भाषणातुन संदेश दिला. कार्यक्रमामध्ये बुध्द गया येथील महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाला पाठींबा देऊन महाबोधी विहार बौध्दाच्या ताब्यात देण्याचा ठराव पारीत करण्यात आला. सदर कार्यक्रम कांतीरत्न महात्मा जोतीबा फुले आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रसेन काळखैर यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आला. व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आनंद जाधव यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन दिलीप हिरे यांनी केले. या प्रसंगी सर्व जयंती उत्सव समितीचे कार्यकर्ते आयु.यु.आर. रोडे,दिलीप हिरे,महेंद्र फाले,पी. के.वणीस,वैभव उर्फ कल्याण काळखैर (समाज भुषण पुरस्कर्ते महाराष्ट्र राज्य),श्रीरंग गायकवाड, के.एस.वाकडे,विनोद वानखेडे, उत्तम इंगळे,मनोज सरदार लक्ष्मण सोनावणे, विनोद झणके, संजय झणके,बन्सीधर माने यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता परिश्रम घेतले.
More Stories
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन संपन्न – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अभिनेत्री करुणा काथखडे यांजकडून मोफत पाणी वाटप