धाराशिव-अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई सन २०२५-२०२७ या तीन वर्षाकरिता सुरेश टेकाळे यांची सल्लागारपदी निवड, सुनील पुजारी प्रमुख कार्यवाह पदी निवड,डॉ.गिरीष कुलकर्णी धाराशिव जिल्हा प्रतिनिधी पदी निवड.धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार तिघांचा करण्यात आला.मानद अध्यक्ष एम.डी.देशमुख,सचिव अनंत सूर्यवंशी,कोषाध्यक्ष प्रेमचंद देवसाळे,उपाध्यक्ष राहुल सोनवणे,यांच्या उपस्थितीत शाल,बुके,पुस्तक देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे ठिकाण धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघ धाराशिव या कार्यालय धाराशिव येथे संपन्न झाले.मानद अध्यक्ष एम.डी. देशमुख यांनी याप्रसंगी विचार व्यक्त केले.त्यामध्ये त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये साने गुरुजी कथामाला काम अतिशय नियोजन पूर्ण चालू आहे याही पुढे कथा वाल्याचा काम उत्कृष्ट होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे हे काळाची गरज आहे असे मत व्यक्त केल कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय भोईटे यांनी केले.सूत्रसंचालन अनंत सूर्यवंशी, आभार हनुमंत गायकवाड यांनी मानले.या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील प्राचार्य फुलचंद कदम,शाहूराज जाधव, मुख्याध्यापक ए.पि.वरपे , शिवाजी आवारे,डी.एस.भोसले, सुनील पडघन,एकनाथ चव्हाण, चौधरी व सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते.
More Stories
बँकांनी पिक कर्जासह अन्य योजनांसाठी कर्ज वेळेत उपलब्ध करुन द्यावेत – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार
२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार
मनाने मोठे… दिलदार मनाचे… संवेदनशील व्यक्तिमत्त्व-डॉ.प्रतापसिंह (भैय्यासाहेब) पाटील