कळंब – तालुक्यातील मोहा येथील सागर पाटील हे मंजूर स्वतंत्र विद्युत रोहित्र स्थापित न झाल्यामुळे शहरातील उपकार्यकारी अभियंता कार्यालयाच्या परिसरात दि.२७ मार्च २०२५ पासून आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांनी २० मार्च २०२५ रोजी जिल्हाधिकारी धाराशिव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,माझे आजोबा आबासाहेब वीर यांच्या नावे HVDS (प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र विद्युत रोहित्र) योजनेतून ७ जानेवारी २०२२ रोजी तीन फेज विद्युत रोहित्र मंजूर झाले होते.मजूर स्वतंत्र कृषित्र विद्युत रोहित्र (HVDS),मंजुरी क्रमांक- ६०६६९०७३०४९४.परंतु,दोन वर्ष उलटूनही आजपर्यंत संबंधित विभागाकडून रोहित्र बसवण्यात आलेले नाही.या संदर्भात सागर पाटील यांनी महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा तक्रारी केल्या असतानाही कुठलीही कार्यवाही झालेली नाही.प्रत्येक वेळी केवळ आश्वासन देण्यात आले.विशेषतः ठेकेदारांकडून लाच वीस हजार रुपये मागण्यात येत होते तरी त्याबाबत ची समक्ष मोहा विद्युत केंद्र अभियंता कुटे यांना भेटून दिली होती.त्यावेळी आपले काम लवकर होईल असे आश्वासन त्यांनी दिले होते परंतु पैसे न दिल्याने अजूनही काम पूर्ण झाले नाही याबाबत लेखी तक्रार न दिल्याने माझ्या अर्जाकडे दुर्लक्ष केले जात आहे.तसेच त्यांनी पुढीलप्रमाणे आप बीती मांडली आहे – महावितरण अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही कोणीही दखल घेतली नाही.ठेकेदारांकडून लाच मागण्यात येत आहे,आणि पैसे न दिल्यास काम थांबवले जात आहे.शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी लाच द्यावी लागत असेल,तर ही गंभीर बाब आहे, ही परिस्थिती म्हणजे सरकारी योजनांची दिशाभूल असून,अधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष वृत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे तरी जिल्हाधिकारी यांनी मंजूर झालेले रोहित्र त्वरित बसवण्यात यावे व झालेल्या विलंबाची जबाबदारी निश्चित करण्यात यावी,ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी,भविष्यात शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी कोणत्याही प्रकारची लाच द्यावी लागू नये, यासाठी प्रभावी उपाययोजना करावी व तक्रारीची दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी व महावितरणच्या वरिष्ठ स्तरावर ही तक्रार तातडीने पोहोचवून त्यावर ठोस निर्णय घेतला जावा.
More Stories
सावित्रीबाई फुले विद्यालयात योग दिन साजरा
योगा आनंदी जीवनाची गुरुकिल्ली – ॲड.सुरेश कुलकर्णी
पाथर्डी शाळेत योग दिवस उत्साहात साजरा