कळंब (अविनाश घोडके) – नळदुर्ग किल्ल्यावर शासनाकडून पुरविल्या जाणाऱ्या विविध सुविधांची अंमलबजावणी आणि विद्यार्थ्यांना होणाऱ्या फायद्यांबाबत नवनियुक्त जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी भैरवनाथ अध्यापक विद्यालयातील डी.एल.एड. विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपुलकीने चौकशी केली. धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतीश मातने यांच्या मार्गदर्शनाखालील वेद शैक्षणिक संकुलातील भैरवनाथ अध्यापक विद्यालयाची दि.४ मार्च २०२५ वार मंगळवार रोजी धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्लाचा अभ्यास करण्यासाठी सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवनियुक्त जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या दौऱ्यादरम्यान भेट झाली.यावेळी त्यांनी छात्राध्यापकांशी संवाद साधला. किल्ल्याच्या ऐतिहासिक वारशाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांना स्थानिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक संधी मिळाव्यात,यासाठी शासन विविध योजना राबवत आहे.या योजनांचा खरा लाभ विद्यार्थ्यांना मिळतोय का,तसेच कोणत्या अडचणी येत आहेत,याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी स्वतःपुढाकार घेतला. चौकशीदरम्यान विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्य,ग्रंथालय सुविधा,मार्गदर्शन शिबिरे आणि प्रशिक्षण कार्यक्रम यासंदर्भात आपल्या अनुभवांची मोकळेपणाने मांडणी केली. काही विद्यार्थ्यांनी पिण्याच्या पाण्याचा अभाव,नियोजनाचा अभाव,स्वच्छतागृह व्यवस्थापन आणि वाहतुकीच्या अडचणींबाबत सूचना मांडल्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि विकास ही आपली प्राथमिकता आहे.नळदुर्ग किल्ल्यासारख्या ऐतिहासिक ठिकाणी कोणत्याही सोयी-सुविधांपासून वंचित राहू नये,यासाठी आम्ही आवश्यक ती पावले उचलू.” या संवादाच्या माध्यमातून मिळालेल्या सूचनांवर जिल्हा प्रशासन तातडीने कार्यवाही करणार असून,भविष्यात अशा संवाद सत्रांचे नियमित आयोजन करण्यात येईल,असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यावेळी भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्रा.श्रीकांत पवार,प्रा.मोहिनी शिंदे,प्रा. अविनाश घोडके व सर्व छात्राध्यापक उपस्थित होते.
More Stories
प्रवेशोस्तवामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास द्विगुणित होतो – आ.विक्रम काळे
बहुजन समाज परिवर्तन क्रांतीत शिक्षकांचे योगदान महत्वाचे- ॲड.मंगेश ससाणे
अडथळ्याची शर्यत पार करतो तोच गुणवंत ठरतो – करियर मार्गदर्शक गणेश लोमटे