धाराशिव (जिमाका) – वृद्धापकाळाशी संबंधित व्याधींच्या उपचारासाठी शासकीय आयुर्वेद रुग्णालय,धाराशिव येथे विशेष जेरियाट्रिक ओपीडी सुरू करण्यात आली आहे.मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या ‘१०० दिवसांच्या कृती आराखड्या अंतर्गत आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबवण्यात आला आहे.यामुळे ६० वर्षांवरील नागरिकांना आयुर्वेदिक उपचार आणि तज्ज्ञ सल्ला मिळणार आहे. भारतात आयुर्मान वाढत असल्याने वृद्धापकाळातील आरोग्य समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. संधिवात,मधुमेह,उच्च रक्तदाब, बद्धकोष्ठता,अशक्तपणा यांसारख्या आजारांवर आयुर्वेदिक उपचार प्रभावी ठरू शकतात.जेरियाट्रिक ओपीडीद्वारे वृद्धांना नियमित आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि जीवनशैली सल्ला देण्यात येत आहे. सामान्य आरोग्य तपासणी आणि सल्ला,मधुमेह,उच्च रक्तदाब, संधिवात,अशक्तपणा यावर आयुर्वेदिक उपचार,पक्षाघात, कंपवात (Parkinson’s), स्मृतीभ्रंश, निद्रानाश यांसारख्या गंभीर विकारांवर उपचार,आयुर्वेदिक औषधे – अश्वगंधा,शतावरी,गुग्गुळ, आमलकी यांचा समावेश,आहार आणि जीवनशैली सल्ला – वात दोष संतुलित करण्यासाठी मार्गदर्शन, नियमित फॉलो-अप आणि पुनरावलोकन सेवा वृद्धत्वामुळे शरीरात वात दोष वाढतो, ज्यामुळे सांधेदुखी,अशक्तपणा, झोपेचे विकार आणि मानसिक अस्वस्थता निर्माण होऊ शकते. आयुर्वेदात योग्य आहार, औषधोपचार आणि पंचकर्म उपचारांद्वारे या समस्यांवर उपाय सुचवले आहेत.यामुळे वृद्धावस्थेतही सुदृढ आरोग्य राखता येऊ शकते. धाराशिव येथील शासकीय आयुर्वेद रुग्णालयात जेरियाट्रिक ओपीडी सुरू झाल्यापासून २३६ हून अधिक वृद्ध रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. या उपक्रमामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना आयुर्वेदाच्या मदतीने आरोग्य सुधारण्याची संधी मिळत आहे.भविष्यात या ओपीडीचा व्यापक विस्तार करण्याची योजना रुग्णालय प्रशासनाने आखली आहे. ही सुविधा वृद्धांसाठी नवे आशेचे किरण ठरत असून,आयुर्वेदाच्या मदतीने ते अधिक निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकतात. धाराशिवमध्ये सुरू झालेला हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी आदर्श ठरू शकतो,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अधिष्ठाता डॉ.गंगासागरे यांच्या मार्गदर्शनाखाली कायचिकित्सा विभागाच्या माध्यमातून प्रभारी विभाग प्रमुख वैद्य विनायक पाचे आणि सहाय्यक प्राध्यापक वैद्य विलास बोरसे यांच्या देखरेखीखाली या प यशस्वी संचालन होत आहे. अधिष्ठाता डॉ.गंगासागरे यांनी जिल्ह्यातील सर्व वृद्ध नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि आयुर्वेदाच्या मदतीने निरोगी व सुदृढ जीवनशैली अंगीकारावी,असे आवाहन केले आहे.” आरोग्यदायी जीवनशैलीसाठी आयुर्वेद वृद्धापकाळात देखील निरोगी व आनंदी जीवनशैली राखण्यासाठी आयुर्वेद हे सर्वोत्तम साधन आहे. धाराशिव येथील जेरियाट्रिक ओपीडी हा वृद्धांच्या आरोग्यासाठी आशेचा किरण ठरत असून,या उपक्रमामुळे आयुर्वेदाच्या प्रचार – प्रसाराला नवे बळ मिळत आहे . वृद्धापकाळाशी संबंधित व्याधींच्या उपचारासाठी शासकीय आयुर्वेद रुग्णालय,धाराशिव येथे विशेष जेरियाट्रिक ओपीडी सुरु करण्यात आली आहे.मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या १०० दिवसांचा कृती आराखडा अंतर्गत आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या निर्देशानुसार हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. भारतातील आयुर्मानात झालेली प्रचंड वाढ ही वृद्धापकाळातील चिंतेची बाब बनत आहे . वृद्धापकाळात उद्भवणाऱ्या विविध शारीरिक आणि मानसिक समस्यांसाठी आयुर्वेद प्रभावी उपाय प्रदान करू शकतो.जेरियाट्रिक ओपीडी अंतर्गत ६० वर्षे व त्यावरील रुग्णांना आयुर्वेदिक उपचार व सल्ला उपलब्ध करुन दिला जात आहे .
More Stories
उपशिक्षणाधिकारी दत्ताप्रसाद जंगम यांचा राष्ट्रीय ओबीसी अधिकारी महासंघाचे वतीने सत्कार
माजी सैनिक पाल्याकरिता अग्निवीर सैन्य भरतीची संधी
खोट्या निवड याद्यांपासून सावध राहा:आरोग्य विभागाचे आवाहन