June 20, 2025

शहरातील निकृष्ट विकास कामांकडे मुख्याध्याकारांनी लक्ष द्यावे

  • कळंब – शहरात नगर परिषदेमार्फत विविध कामे सुरू आहेत.मात्र,ही कामे अत्यंत निकृष्ठ दर्जाची होत आहे.या कामाच्या गुणवत्तेकडे नगर पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.त्यामुळे या कामांवर मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे,या मागणीसाठी काँग्रेस कमिटी कामगार विभागाचे शहराध्यक्ष विशाल वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
    कळंब नगर परिषदेच्या वतीने शहरात विविध विकास कामे सुरू आहेत.मात्र,या कामांचा दर्जा अत्यंत सुमार असल्याने भविष्यात याचा शहरवासीयांना त्रास होण्याची शक्यता आहे. सदर कामावर नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून लक्ष ठेवण्याची गरज असताना त्याकडे कोणीही फिरकत नाही.शिवाय मुख्याधिकारीही कामावर फिरकत नाहीत.त्यामुळे गुत्तेदारामार्फत होत असलेली कोट्यावधीची विकास कामे कोणाच्या भरोशावर होत आहेत?असाच संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. शहरातील विकास कामावर नगर
    पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.शहरातील शेरे गल्ली व इंदिरानगर भागातील रस्त्याचे खोदकाम सुरू आहे.मात्र,हे करत असताना पाण्याची समस्या याची कसलीही सोय केलेली नाही. सदरील कामावर मुख्याधिकारी, नगर अभियंता यांचे लक्ष नाही. त्यामुळे या विकास कामावर लक्ष देऊन निकृष्ट होत असलेली कामे योग्य करावीत,कामावर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे,असही तक्रारी निवेदनात म्हटले आहे.सदर निवेदनाची दखल न घेतल्यास घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा वाघमारे यांनी दिला आहे.
error: Content is protected !!