धाराशिव – कळंब तालुक्यातील माळकरंजा येथील मागासवर्गीय समाजाचे राजकुमार तूपसौंदरे व काही ग्रामस्थ दि.२९ जुलै २०२४ पासून पुढील मागण्यांच्या कार्यवाहीसाठी धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. शासकीय गट नंबर २९१ मधील मागासवर्गीय स्मशानभूमीच्या जागेतील शासकीय व खाजगी अतिक्रमण काढून संरक्षक भिंत बांधणे व समशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण आहे हे फोटो, अर्ज करून संबंधितना निदर्शनास आणून देखील त्यांना पाठिंबा देणाऱ्या व अतिक्रमण करणाऱ्या संबंधितावर नियमानुसार उचित कार्यवाही करावी,शासकीय गट नंबर २९१ मोजून त्यामधून मधून दफनभूमी व शेतीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कायमस्वरूपी हद्दी खुणा करून रस्ता तांत्रिकदृष्ट्या योग्य करणे व गटाच्या हद्दीवर झाडे लावणे, शासकीय गट नंबर २९१ मधील २०११-१२ मध्ये भ्रष्टाचारी शासकीय अधिकारी व संबंधितांनी कागदोपत्री केलेल्या रस्त्याची चौकशी करून शासनाला व शेतकऱ्यांना लुटणाऱ्या नराधमांकडून २०२३ पर्यंत रस्ता बंद असल्यामुळे जो शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास झाला त्यांच्याकडून वसूल करणे व ०८/०५/२०२३ रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणकरून स्वखर्चाने तात्पुरत्या स्वरूपाचा रस्ता केलेल्या पिढीत शेतकऱ्यांना १,५०,०००/ मोबदला मिळणे, ०८/०५/२०२३ रोजी उपोषण करून २८/०६/२०२४ पर्यंत पाठपुरावा करून लेखी व तोंडी विनंती व अर्ज करून जनतेच्या टॅक्स मधून फुकट पगार घेणाऱ्या, वर्षभर झोपलेल्या अधिकाऱ्यांची व संबंधितांची दप्तर दिरंगाई कायद्यानुसार गुन्हा दाखल करून उपोषणाला बसण्यास प्रवृत्त केल्यामुळे संबंधित दोशी अधिकाऱ्यांना निलंबित करणे
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान