June 19, 2025

भीम आर्मी विद्यार्थी फेडरेशन शहराध्यक्षपदी सागर साखरे यांची निवड

  • लातूर – भीम आर्मी संस्थापक अध्यक्ष तथा खा.भाई चंद्रशेखर आजाद,राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनय रतन सिंग यांच्या आदेशाने महाराष्ट्र अध्यक्ष विद्यार्थी फेडरेशन ऋषी भाई पोळ यांनी लातूर शहर अध्यक्षपदी सागर साखरे यांची निवड केली. सध्याच्या काळामध्ये शिक्षणाचा बाजार झालेला असताना शिक्षण संस्था ह्या विद्यार्थ्यांच्या पालकाकडून अमाप पैसा घेऊन पवित्र शिक्षण हे बदनाम करत आहेत,प्रत्येक गोष्टीमध्ये विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर फीस आणि डोनेशन भरावी लागत आहे,त्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.विद्यार्थ्यांसाठी लढा उभा करण्यासाठी भीम आर्मीच्यावतीने विद्यार्थी फेडरेशन तयार करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र अध्यक्ष विद्यार्थी फेडरेशन भाई ऋषी कोळी यांनी सागर साखरे यांना लातूर शहराध्यक्षपदी निवड केली.या निवडीचे पत्र भीम आर्मी भारत उत्तम मिशन राष्ट्रीय महासचिव अशोक भाऊ कांबळे, मराठवाडा निरीक्षक अक्षय धावारे,माजी मराठवाडा अध्यक्ष विनोद भाऊ कोल्हे,माजी मराठवाडा संघटक मिलिंद शिंदे, लातूर जिल्हाध्यक्ष विलास अण्णा चक्रे यांच्या उपस्थितीमध्ये नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यातील टीम उपस्थित होती.
error: Content is protected !!