धाराशिव (जिमाका) – सार्वजनिक वितरण व्यवस्था प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी व त्याअनुषंगाने राबविण्यात येणा-या सर्व प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हयातील १०० टक्के लाभार्थी ई-केवायसी प्रमाणिकरण होणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांना एक देश एक शिधापत्रिका योजनेप्रमाणेच त्यांच्या स्वगृही राज्यात न जाता कोणत्याही ठिकाणाहून ई-केवायसी प्रमाणिकरण प्रक्रिया पुर्ण करण्याची सुविधा केंद्र शासनाने उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार सुविधा ई-पॉस मशिनवर कार्यान्वित करण्यात आली आहे. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी शासनाकडून ई-केवायसी न झालेल्या लाभार्थ्यांची यादी तालुकानिहाय व दुकाननिहाय प्राप्त झाली आहे.ही यादी सर्व तहसिल कार्यालय तसेच स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे वितरीत करण्यात आली आहे. तरी या यादीतील सर्व शिधापत्रिकाधारक यांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांसमवेत आपले आधारकार्डसहित संबंधित स्वस्त धान्य दुकानामध्ये जाऊन प्राधान्याने ई-पॉस मशिनवर अंगठा प्रमाणित करून आपले ई-केवायसी प्रमाणीकरण माहे नोव्हेंबर २०२४ अखेर पुर्ण करून घ्यावे.अन्यथा ज्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण पुर्ण होणार नाही,अशा लाभार्थ्यांचे धान्य वाटप थांबविण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी सर्व शिधापत्रिका लाभार्थ्यांनी आपले ई-केवायसी प्रमाणीकरण करून घ्यावे.असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
More Stories
बँकांनी पिक कर्जासह अन्य योजनांसाठी कर्ज वेळेत उपलब्ध करुन द्यावेत – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार
२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार
मनाने मोठे… दिलदार मनाचे… संवेदनशील व्यक्तिमत्त्व-डॉ.प्रतापसिंह (भैय्यासाहेब) पाटील