धाराशिव (जिमाका) – महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ या निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला असून हा कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे.
भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार कोणत्याही परिस्थितीत सुरक्षेसाठी असलेल्या मोटारगाड्या / वाहने / मोटारसायकल यांच्या ताफ्यात दहापेक्षा अधिक वाहने वापरता येणार नसल्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी काढला आहे.
जिल्हयातील विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून दहापेक्षा अधिक मोटारगाडया मोटारसायकल / वाहनाच्या ताफ्याचा वापर करण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४४ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये दिला आहे. कोणत्याही वाहनाच्या ताफ्यामध्ये दहापेक्षा जास्त मोटार गाडया / मोटारसायकल अथवा वाहने ( Cars/Vechicles/Bikes ) वापरण्यास या आदेशाव्दारे निर्बंध घालण्यात येत आहेत.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान