कळंब – आजचा विद्यार्थी केवळ पुस्तकी कीडा न राहता त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण देण्याचे प्रयत्न वाङ्मय मंडळाच्या माध्यमातून केले जातात. महाविद्यालयीन युवकांमध्ये वाचन – लेखनाची अभिरुची निर्माण व्हावी,असे मत उमेश मोहिते (ज्येष्ठ साहित्यिक, अंबाजोगाई) यांनी मांडले. ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ.सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात दि.५ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी,हिंदी आणि इंग्रजी भाषा वाङ्मय मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, “मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील या मंडळामध्ये सर्व प्रकारचे हे वर्षभरासाठी नियोजन विद्यार्थीच करतात. यात विविध कलांची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करून युवक महोत्सव, निबंध, वक्तृत्व आणि वादविवाद अशा स्पर्धातून सहभागी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी संधी दिली जाते, त्यामध्ये नावीन्य आणण्यासाठी प्राध्यापकांचे मार्गदर्शन महत्वाचे असते. तसेच विद्यार्थी व प्राध्यापकांच्या समन्वयातून उपक्रम राबवतात.” सुरुवातीला संस्थेचे संस्थापक पूज्य ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुनिल पवार, प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. मुकुंद गायकवाड, प्रा. पंडित शिंदे, उपप्राचार्य डॉ. हेमंत भगवान, डॉ.के. डी. जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी शब्दशिवार या विद्यार्थी संपादक मंडळानी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. प्राचार्य डॉ.सुनील पवार म्हणाले, “ विद्यार्थ्यांच्या वाङ्मयीन कलागुणांना चालना देण्याच्या उद्देशाने ज्ञानदीप वाङ्मयीन वार्षिक अंक अविरत काढण्यात येतो. साहित्यिक आपल्या भेटीला, कविसंमेलन, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, आर्थिक साक्षरता, स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबंदी, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन व भ्रष्टाचार निर्मूलन अशा विषयांवर भित्तिपत्रकाचे प्रकाशन, निबंध लेखन असे उपक्रम राबवले जातात. महाविद्यालयाला ५५ वर्षांची सुवर्णमहोत्सवी परंपरा असून या कार्यक्रमांतून वाङ्मय मंडळ कार्यरत आहे. त्यातून आजतागायत अनेक विद्यार्थी कलावंत घडले आहेत.” यावेळी डॉ.गायकवाड यांनी ही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. दीपक सूर्यवंशी तर प्रास्ताविक हिंदी विभागप्रमुख डॉ. दत्ता साकोळे, अतिथी परिचय मराठी विभागप्रमुख डॉ. दादाराव गुंडरे आणि आभार प्रा. नितीन अंकुशराव यांनी मानले. या कार्यक्रमासाठी अधीक्षक हनुमंत जाधव, कमलाकर बंडगर, चांगदेव खंदारे यांनी परिश्रम घेतले. यावेळी डॉ.आर.व्ही. ताटीपामुल, प्रा.ए.आर.मुखेडकर, प्रा.डॉ.पल्लवी उंदरे, प्रा.राजीव कारकर,प्रा. मारुती शिंपले,प्रा.बालाजी बाबर, प्रा.डॉ.बालाजी वाघमारे, प्रा. डॉ. समाधान चंदनशिवे, प्रा.शाहरुख शेख, प्रा.दिलीप नवघरे, प्रा.एन.एम.अदाटे तसेच विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतत्तर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
More Stories
ग्रामीण शिक्षणाचा प्रेरणास्त्रोत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे