कळंब ( माधवसिंग राजपूत ) – बिड ,लातुर ,धाराशिव जिल्हयातील पिण्याचे पाणी, शेती या साठी महत्वपूर्ण आसलेला धनेगांव ता.केज जिल्हा बीड येथील मांजरा प्रकल्प 95.05%* क्षमतेने भरला असुन प्रकल्प पूर्ण होऊन 44 वर्ष होत आहेत यातील सतरा वेळा हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे.यावर्षी 2 सप्टेंबर रोजी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाटोदा ,भूम, वाशी क्षेत्रात पाऊस झाल्याने व डोकेवाडी येथील अप्पर मांजरा प्रकल्प भरल्याने नदीपात्रात पाण्याचा यावा वाढल्याने धरणाची पाणी पातळी वेगाने वाढण्यास मदत झाली यामुळे बीड जिल्ह्यातील केज ,धारूर धाराशिव जिल्ह्यातील कळंब, लातूर जिल्ह्यातील लातूर शहर, लातूर औद्योगिक व मुरुड या गावासाठी पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे तसेच धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांना धरण तसेच डाव्या व उजव्या कालव्यातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे , प्रकल्पाची पाणी पातळी 25-09-2024 रोजी 95.05 % मिटर मध्ये 642 .18 / 642.37 एकूण पातळी 215.285 / 224.093 झाली आहे, दिनांक 21 सप्टेंबर पासुन प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाउस पडत आहे,या मुळे प्रकल्पात पाण्याची आवक वाढत आहे आवकदर 8.157, 94.41क्युमेक्स 3334 क्युसेक्स ( 24 तास ) आहे पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे धरण कोणत्याही क्षणी पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. या मुळे धरण क्षेत्रात होणारी पाण्याची आवक पाहता मांजरा धरणाच्या सांडव्याद्वारे मांजरा नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आसुन 25 सप्टेंबर, बुधवारी दुपारी प्रकल्पाची दोन दरवाजे 0.25 मिटरने उंचाऊन 1हजार 730 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे तसेच धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. अशी माहिती मांजरा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली असून, मांजरा नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी सतर्क रहावे. कोणीही मांजरा नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जिवीत अथवा वित्त हानी होणार नाही याची नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असा इशारा देण्यात आला आहे.
More Stories
सावित्रीबाई फुले विद्यालयात योग दिन साजरा
योगा आनंदी जीवनाची गुरुकिल्ली – ॲड.सुरेश कुलकर्णी
पाथर्डी शाळेत योग दिवस उत्साहात साजरा