कळंब – कृषि उत्पन्न बाजार समिती,कळंबचे कार्यक्षेत्रात सद्या सोयाबीन पिकाचा पेरा चांगला असल्याने उत्पादन क्षमता वाढली आहे.सद्या सोयाबीन उडीद मुग चा हंगाम सुरू झाला असून उत्पादकता मोठ्या प्रमाणात आहे.अनेक ठिकाणी बाजार समितीचा परवाना अथवा थेट पणन परवाना न घेता अनेक अवैद्य खरेदीदार तयार झाले आहेत.अनेक जनेक जन शेतकऱ्यांची फसवणूक करण्याकरीता जादा भावाच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करताना दिसून येत आहेत, असे खरेदीदार सोयाबीन खरेदी करताना वजन काट्यात बिघाड करून शेतकऱ्यांना प्रति क्वि.३ ते ५ किलोची लूट करत आहेत.काही व्यापारी अनामत म्हणून जादा दराने खरेदी करतात व मोठ्या प्रमाणात खरेदी करून पळून जातात यातून अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाली असल्याने अनेकांनी आपले जीवन संपवीले आहे. असे असंख्य तयार झालेले अवैद्य खरेदीदार ज्यांची बाजार समितीमध्ये कुठेही नोंद अथवा कसलाही परवाना न घेता खरेदी करतात यातून शासनाचे व करोडो रूपयांचे नुकसान होत आहे. बाजार समितीची पक्की पावती नसल्याने शेतकऱ्यांना कोठेही दाद मागता येत नाही. शेतकऱ्यांच्या हीता करीता स्थापन झालेल्या बाजार समितीची शेतकरी पावती शेतकऱ्यांनी आवर्जून मागवून घ्यावी.शासनाच्या शेतमाल विक्री बाबत कोणतीही योजना लागू झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळण्यासाठी पक्की पावती आवश्यक असते. कोणताही शेतकरी शेतमालाच्या लागू होणाऱ्या योजना पासून वंचीत राहू नये या करीता व्यापारी वर्गाने सर्वांना पक्की पावती द्यावी. पक्की पावती न देणाऱ्या व्यापाऱ्यांची तक्रार बाजार समितीच्या खालील नंबरवर संपर्क करून तक्रार नोंदवावी. असे आवाहन बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे, उपसभापती श्रीधर भवर व संचालक मंडळ यांनी केले आहे.
More Stories
ग्रामीण शिक्षणाचा प्रेरणास्त्रोत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे