कळंब ( साक्षी पावनज्योत ) – गाजापुर तालुका शाहुवाडी जिल्हा कोल्हापूर येथे जाती हिंसाचार करणाऱ्या व कायदा सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या समाज कंटकाच्या विरोधात कडक कारवाई करावी या मागणी साठी दिनांक १९ जुलै रोजी सकल मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने कळंब बंदची हाक देण्यात आली होती.कळंब शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला शहरातील मेडिकल दुकाने वगळता सर्व दुकाने ,शाळा,महाविद्यालय बंद होती. दुपारी तीन वाजता बागवान चौक कळंब येथून सकल मुस्लिम समाज बांधवांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चासमोर मुसद्दिक काझी, मौलाना यह्या यांनी या घटनेबद्दल निषेध व्यक्त करीत मुस्लिम समाजाच्या तीव्र भावना शासनाच्या दरबारी पोहोचवीत असल्याचे सांगितले तर संभाजी ब्रिगेडचे मराठवाडा प्रदेश संघटक अतुल गायकवाड व लहुजी शक्ती सेनेचे बालाजी गायकवाड यांनी गजापूर येथील घटनेचा निषेध व्यक्त केला व मुस्लिम समाजाला पाठिंबा व्यक्त केला मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने तहसीलदार कळंब यांनी स्वीकारले. या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत. हिंसाचार व जाळपोळ करून सामाजिक सलोखा व कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण करणाऱ्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी , गजापूर येथील हिंसाचारात जे काही तेथील नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. शेकडो वर्षापासून प्रार्थना स्थळे आहेत त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था शासनाने करावी, मुस्लिम समाजावर सतत होणारी अत्याचार विरोधात पोलीस अधीक्षक यांच्या द्वारे प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्यांक अत्याचार प्रतिबंधक समिती स्थापन करावी व त्याची अमलबजावणी करावी.सोशल मीडियात मुस्लिम समाजाबद्दल आणि त्यांच्या आस्थेशी जोडलेल्या धार्मिक स्थळाबद्दल व्हिडिओ करणाऱ्या व धार्मिक भावना दुखवणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे.
More Stories
श्री गुलाब महाराज दिंडीचे हरी नामाच्या गजरामध्ये स्वागत
कळंबमध्ये विकसित भारत संकल्प मेळावा संपन्न
विद्याभवन हायस्कूल कळंब येथे जागतिक ऑलिंपिक डे साजरा