June 23, 2025

शंभर वर्ष वय असलेले पंढरीच्या वाटेवरील वारकरी

  • कळंब ( माधवसिंग राजपूत ) – आषाढी वारीसाठी विदर्भ व पूर्व मराठवाडा या भागातून शेकडो पायी दिंडी मधून हजारो वारकरी विठ्ठल नामाचा गजर करीत श्रीक्षेत्र पंढरपूर कडे माऊलीच्या दर्शनाच्या ओढीने कळंब मार्गे जात असतात.काही दिंड्या कळंब येथे मुक्कामी असतात तर काही दिंड्या दुपारचे भोजन घेऊन पुढील प्रवासास निघतात. या दिंडी मधील चाकातीर्थ पूर्व परमपूज्य पंडित बाबा संस्कार मठ जवुळका रेल्वे तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथील १०० वारकऱ्यांचा समावेश असलेली दिंडी दिनांक १० जुलै रोजी कळंब येथे भक्त सुरेश रामभाऊ कल्याणकर यांच्याकडे भोजनासाठी थांबली होती. दिंडीचे कल्याणकर परिवाराच्या वतीने मोठ्या भक्ती भवानी स्वागत करण्यात आले व दिंडीतील वारकऱ्यांना स्वादिष्ट भोजन देण्यात आले. गेली दहा वर्ष कल्याणकर परिवाराची ही अखंड सेवा सुरू आहे.या दिंडीचे २४ जून रोजी प्रस्थान झाले असून दिनांक १६ जुलै रोजी दिंडी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचत आहे. दिंडीचा दिनांक २१ जुलै पर्यंत मुक्काम आहे.कळंब येथील सतरावा मुक्काम होता.याप्रसंगी दिंडीचे प्रमुख ह.भ.प.वैष्णवदास रामचंद्र महाराज बोरगांवकर असून महाराजांच्या जीवन कार्याविषयी त्यांचा नातू मोठ्या मुलीचा मुलगा व ह.भ.प. संदीपान महाराज पोफळे शास्त्री यांनी जोग महाराज शिक्षण संस्था देवाची आळंदी येथे वारकरी शिक्षण पूर्ण केले आहे. ते आज ही परंपरा सार्थपणे सांभाळीत आहे त्यांनी महाराजा विषयी माहिती देत असताना सांगितले महाराजांचे आज वय जवळजवळ शंभर वर्षाचे आहे. कानाने ऐकू येत नाही, आधाराशिवाय चालता येत नाही, तरीपण मनात माऊलीच्या दर्शनाची मनात ओढ असल्याने त्यांचा दिंडी सोबत येण्याचा आग्रह कायम आहे .परमपूज्य पंडित बाबा संस्कार मठ जवुळका रेल्वे तालुका मालेगांव जिल्हा वाशिम येथे असून ह.भ. प. वैष्णवदास रामचंद्र महाराज बोरगावकर महाराजांना चार मुली आहेत. वडिलोपार्जित साठ एकर जमिनीचे मालक असताना त्यांनी ही जमीन मठास दान दिली आहे. त्यांचे संपूर्ण जीवन ईश्वर सेवेसाठी समर्पित आहे. मच्छिंद्रनाथ परंपरेशी अंकित असलेल्या विश्वनाथ बाबा यांच्या कृपादृष्टीने व अज्ञाने या सोहळ्यास सुरुवात करण्यात आली.या संस्थांच्या माध्यमातून अध्यात्मिक कार्यक्रम घेण्यात येतात. यात पंडित बाबा पुण्यतिथी सोहळा आयोजित केला जातो.यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह-भागवत व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण कार्यक्रमाचा आयोजन केले जाते तसेच वार्षिक नियमानुसार श्री क्षेत्र माहूरगड शिखरावर श्री दत्त जयंती उत्सवासाठी पालखीचे प्रस्थान होत असते असे सांगितले.
error: Content is protected !!