June 20, 2025

रूढी परंपरेला फाटा देत मुलाच्या लग्नातील सर्व खर्च स्वतःकेला;विलास करंजकर यांचा समाजा पुढे आदर्श

  • कळंब ( माधवसिंग राजपूत )- लग्न म्हणजे भव्य मंडप ,आकर्षक सजावट, घोडा, डीजेचा कर्ण कर्कश आवाज यात डान्सची धमाल हे आता सर्व रूढ झाली आहे यातच मोठेपणा व प्रतिष्ठा समजली जाते यासाठी लाखो रुपये खर्च केला जातो परंतु कळंब येथील प्रगतिशील शेतकरी ,सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विलास बप्पा करंजकर यांनी आपल्या एकुलत्या एक मुलगा ( रोहित — अश्विनी ) यांचा विवाह सर्व रूढी परंपरांना फाटा देऊन हुंडा अथवा संसार उपयोगी साहित्य देखील न घेता गेट केन पद्धतीने स्वखर्चाने संपन्न केला आहे.विलास बप्पा यांचा मुलगा एम.ए.इंग्लिश असून कळंब येथे बुक स्टॉलचा व्यवसाय आहे व ५० एकर शेती आहे
    या आदर्शवत कार्याचे कौतुक करण्यासाठी कळंब येथील ज्ञानेश्वर बालकाश्रम येथे आयोजित कार्यक्रमात विलास (बाप्पा) करंजकर यांचा फेटा ,शाल ,पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह. भ.प.महादेव महाराज आडसूळ हे होते.त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आज लग्नात वधू पक्षाकडून हुंड्याच्या स्वरूपात रोख रक्कम,दाग,दागिने व महागड्या वस्तू घेतल्या जातात यामुळे मुलीच्या पालकांना जमीन ,घर, दागिने विकावे अथवा गहाण ठेवावे लागतात.कर्ज काढावे लागते यामुळे मुलीच्या कुटुंबीयांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते या सर्व गोष्टी टाळण्यासाठी सामाजिक दायित्व म्हणून लोकप्रबोधनाची गरज आहे विलास बाप्पा करंजकर यांनी आपल्या मुलाच्या लग्नातील खर्च स्वतः केला, संसार उपयोगी साहित्यदेखील त्यांनी घेतले नाही हा एक समाजापुढील आदर्श आहे असे सांगितले या सत्कार प्रसंगी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजी गिड्डे पाटील ,
    काँग्रेस ज्येष्ठ नेते महमंद भाई,चाऊस, धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश टेकाळे ,ॲड.मनोज चोंदे पाटील,ॲड.नितीन अंगरखे, माधवसिंग राजपूत, संदीप कोकाटे ,सुदर्शन कोळपे, यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!