August 9, 2025

संबळ,बासरी वादन,शिवचरित्र कथा,नृत्य व तबला जुगलबंदीचा घेतला आनंद

  • धाराशिव (जिमाका) – काल महासंस्कृती महोत्सवाचे थाटात उद्घाटन झाले.नागरीकांनी पहिल्याच दिवशी विविध कलाप्रकार आणि नाटकाचा आनंद घेतला.आजही कलाप्रेमी श्रोत्यांनी सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त वतीने आयोजित या महोत्सवाचा लाभ घेण्याचा मोह धाराशिवकरांना आवरता आला नाही. आज दुपारी ४ वाजता सागर चव्हाण व त्यांच्या संघाने संबळ या कलाप्रकाराचे सादरीकरण केले.लुप्त होत असलेल्या कलाप्रकारांना आपल्या डोळ्यांसमोर जिवंत स्वरूपात बघण्याचं योग उपस्थित श्रोत्यांना आला.दुपारी भर उन्हात चार वाजता आयोजित या कार्यक्रमास नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात गर्दी केली व कलावंतांच्या कलागुणांना दाद दिली.
    यानंतर प्रेक्षक ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत होते ते म्हणजे “साध काळजाची काळजाला” या कवी संमेलनाची कलाविष्कार अकादमीतर्फे आयोजित या कवी संमेलनचे अध्यक्ष राजेंद्र अत्रे व इतर निमंत्रित कवी यांच्या कविता आणि काव्यप्रकार सादर करण्यात आले. एकापेक्षा एक कवींच्या कविता ऐकण्याचे सौभाग्य धाराशिवकरांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळाले. कविसंमेलनात अध्यक्ष – राजेंद्र अत्रे, प्रा.डॉ.अरविंद हंगरगेकर,हनमंत पडवळ,डी.के.शेख,शाम नवले,डॉ. रुपेशकुमार जावळे,डॉ.शिवाजी गायकवाड,पंडित कांबळे,मनीषा क्षीरसागर,कृष्णा साळुंके,गणेश मगर, सुवर्णा शिनगारे,मनिषा पोतदार, अश्विनी धाट,स्वप्नाली झाडे, प्रा.प्रशांत गुरव,डॉ.अस्मिता बुरगुटे,युसूफ सय्यद,अथर्व कुलकर्णी,डॉ.संजय सोनटक्के,मीनाताई महामुनी,चंदूबाई खंदारे,विजय गायकवाड,अविनाश मुंडे आदी उपस्थित होते.
    प्रख्यात बासरी वादक जगदीश सुतार यांच्या बासरी वादनाने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कुमारी वसुंधरा गुरव या मुलीने प्रस्तुत केलेले शिवचरित्र कथन ऐकून प्रचंड टाळ्या घेतल्या.मुकेश जाधव यांनी प्रस्तुत केलेला तबला जुगलबंदी आणि प्रख्यात गायिका शर्वरी डोंगरे यांनी राग बिहाग,भक्तीगीते आणि इतर गीत सादर केले.
    आज दुसऱ्या दिवशीही नागरीकांचा उत्साह प्रचंड होता. जिल्हाधिकारी डॉ.ओंबासे यांच्या आवाहनास प्रतिसाद देत धाराशिवकर सहकुटुंब श्री.तुळजाभवानी क्रीडा संकुलावर उपस्थित राहिले आणि विविध कार्यक्रमाचा मनापासून आनंद घेतला.
  • महासंस्कृती महोत्सवात कु.वसुंधरा संजय गुरवचे कौतुक –
    महासंस्कृती महोत्सवात कु.वसुंधरा संजय गुरवने हिने अतिशय उत्कृष्ट पध्दतीने “शिवचरित्र कथन” केले. उपस्थित सर्व प्रेक्षकांनी तिच्या या कार्यक्रमाला टाळ्यांच्या कडकडात प्रतिसाद दिला.शिवचरित्र कथन या विषयांवर व्याख्यान दिल्याबद्दल निवासी उपजिल्हाधिकारी शोभादेवी जाधव यांनी वसुंधरा हिचे तोंडभरुन कौतुक केले.
error: Content is protected !!