धाराशिव (जिमाका)– भारत निवडणूक आयोगाने दि.१२ सप्टेंबर २०२५ रोजीच्या पत्रान्वये जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार ०५-औरंगाबाद विभाग पदविधर मतदारसंघाची अंतिम मतदार यादी दि.१२ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत संबंधित पदविधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणीची प्रक्रिया निरंतर सुरू ठेवण्याबाबत आयोगाने निर्देश दिले आहेत.त्यानुसार ०५-औरंगाबाद विभाग पदविधर मतदारसंघासाठी अद्याप नोंदणी न झालेल्या पात्र पदविधरांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध राहणार आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व पात्र पदविधर मतदारांनी आपले अर्ज संबंधित तहसील कार्यालयात तात्काळ सादर करावेत,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.पात्र मतदारांनी या संधीचा लाभ घेऊन लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा,असेही आवाहन करण्यात आले आहे.
More Stories
“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर” टप्पा-१ सुरू; महसूल सेवा तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा प्रशासनाचा निर्धार
धाराशिवमध्ये १०० विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू
विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद