धाराशिव – बाजारातील सर्रास वापरामध्ये प्लास्टीक फुलांचा वापर ६० टक्के प्रमाणात होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या फुलांच्या विक्रीवर परिणाम होत असून संबधित विभागांना सूचना देवून कृत्रीम फुल निर्माण करणाऱ्या संस्था तसेच विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी केली आहे. अन्यथा या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दुधगावकर यांनी दिला आहे. या निवेदनात म्हंटले आहे की, बाजारातील सर्रास वापरामध्ये प्लास्टीक फुलांचा वापर ६० टक्के प्रमाणात होत असून यामुळे पर्यावरणाचीदेखील हानी होत आहे. शेतातील फुलांच्या विक्रीवर ६० टक्के परिणाम सनासुदीच्या काळामध्ये बाजारपेठामध्ये शेती फुलाची मागणी अल्प झाल्यामुळे शेती फुले रस्त्याच्या कडेला टाकलेली वेळोवेळी पहायला मिळतात. प्लास्टीकच्या कृत्रीम फुलाचा सर्रास वापरामुळे व त्याच प्रमाणात रासायनिक रंगाच्या वापरामुळे बाजारात ही फुले आकर्षक व स्वत: उपलब्ध होत आहेत. त्यामुळे कृत्रीम फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात शासकीय समारंभ व इतर सर्व समारंभामध्ये केला जात आहे हे त्वरीत थांबविणे गरजेचे आहे. शासनाने शेतकऱ्यांना शेडनेट, पॉलीहाउस, फुलांच्या लागवडीसाठी उपलब्ध करुन दिलेले असताना कृत्रीम फुलामध्ये शेडनेट व पॉलीहाउसमधील फुलांना कमीभाव मिळत असल्याने फुल उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. याची शासनाने गांभीर्याने नोंद घेणे गरजेचे आहे. त्यामुळे संबंधित विभागाला सूचना देवून कृत्रीम फुल निर्माण करणाºया संस्था तसेच विक्री करणाºया विक्रेत्यावर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करावी, अन्यथा याविरोधात लोकशाळी मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे.
More Stories
बियाणे न उगवल्याने शेतकरी संकटात,आमदारानी दिला शेतकऱ्यांना आधार
दर्जेदार शिक्षण,उत्कृष्ट जेवण आणि उत्तम राहण्याची व्यवस्था – अरुण घोगरे
मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघाच्या वतीने पृथ्वीराज चिलवंत यांचा वाढदिवस साजरा