धाराशिव – अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा उद्देश म्हणजे शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू ठेवण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेअंतर्गत इयत्ता ११ वी, १२ वी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजनभत्ता, निवासभत्ता व इतर शैक्षणिक सुविधा पुरवल्या जातात. महत्वाचे म्हणजे,शासनाने ही योजना तालुकास्तरावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही लागू केली असून,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आता या योजनेचा लाभ घेण्याची संधी मिळाली आहे. https://hmas.mahait.org या पोर्टलवर सुरू आहे. शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज केलेले पण प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेसाठी स्वतंत्रपणे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जाची छापील प्रत व आवश्यक कागदपत्रे समाज कल्याण कार्यालय,धाराशिव येथे सादर करावीत, असे सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी आवाहन केले आहे.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान