धाराशिव (जिमाका) – जिल्ह्यात २७ ऑगस्ट २०२५ रोजी श्री गणेश आगमन (मूर्ती स्थापना) उत्सव साजरा होणार आहे.उत्सव शांततेत व सुसंवादाने पार पडावा,यासाठी महाराष्ट्र दारुबंदी कायदा,१९४९ मधील कलम १४२ (१) अन्वये धाराशिव जिल्ह्यातील सर्व देशी व विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या एका दिवसासाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध कायद्यानुसार अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल,असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य