धाराशिव (जिमाका) – २५ जून १९७५ ते ३१ मार्च १९७७ या कालावधीत देशात आणिबाणी लागू करण्यात आली होती.या घटनेला २५ जून २०२५ रोजी ५० वर्ष पूर्ण होत आहे.या लोकशाहीच्या लढ्यासंदर्भातील सचित्र प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन बुधवार २५ जून २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता या सचित्र माहिती प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.या प्रदर्शनात आणीबाणीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील बंदीवास सोसलेल्या व्यक्तीची माहिती व त्याअनुषंगाने देशात घडलेल्या विविध घटना-घडामोडींच्या माहितीचा समावेश असणार आहे. यावेळी बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तीचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन करण्यात येणार आहे.या सचित्र माहिती प्रदर्शनास नागरिकांनी भेट दयावी.असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य