June 18, 2025

संकल्प ते सिद्धी अभियान अंतर्गत तालुक्यातील पहिला जनता दरबार उत्साहात संपन्न

  • कळंब – मोदी सरकारच्या ११ वर्षाच्या कालखंडात पीएम किसान,रस्ते विकास,वंदे भारत, अपारंपरिक उर्जा,आरोग्य अशा विविध माध्यमातून देशाला विकसीत भारत म्हणून आकार दिला आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील यांनी केले.
    तालुक्यातील इटकूर येथे भाजपाने ‘संकल्प ते सिद्धी अभियान’ अंतर्गत तालुक्यातील पहिला जनता दरबार इटकुर जिल्हा परिषद गटात आयोजीत केला होता.यावेळी ते बोलत होते. यावेळी या अभियानाचे जिल्हा संयोजक शिवाजीराव गिड्डे, तालुका मंडळ अध्यक्ष अरूण चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
    यावेळी मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष राणाजगजीतसिंह पाटील व जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या या कार्यक्रमात भाजपाने तळागाळातील जनतेच्या हितासाठी राबवलेल्या विविध विकास योजनांचा उहापोह करण्यात आला.राज्य व केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध उपक्रम व योजनांची माहिती देण्यात आली.
    यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी अडसूळ,बाजार समितीचे माजी संचालक प्रणव चव्हाण,ज्येष्ठ नेते बजरंग शिंदे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भुषण करंजकर, युवामोर्चा तालुकाध्यक्ष संताजी वीर,भाजपा कळंब शहराध्यक्ष शीतल चोंदे,माणिक बोंदर, बालाजी मडके हे उपस्थित होते.
    यावेळी नेताजी पाटील यांनी येणारी निवडणूक ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि इथे बसणारा कार्यकर्ता येणाऱ्या काळात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य असेल नाहीतर आपल्या गावातील ग्रामपंचायत चा सरपंच असेल असे सांगत यापुढील काही दिवस कार्यकर्त्याने कामाला लागावे असे सांगितले.या अभियानाला सोबत आज जनता दरबार घेतला गेला. त्यात भरपूर लोकांची कामे मार्गी लागले त्यात दादा चे स्वीयसाय्यक विशाल यादव उपस्थित होते.या कार्यक्रमात इटकुर गणातील सर्व नेते मंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते.
    त्यावेळी सूत्रसंचालन शशिकांत आडसुळ यांनी तर आभार प्रर्शन अभियानाचे तालुका सहसंयोजक सचिन गंभिरे यांनी केले.यावेळी माजी उपसरपंच महादेव पावले, माजी उपसरपंच महादेव आडसुळ,मस्सा (ख) सरपंच त्र्यंबक कचरे, उपसरपंच संदिप तांदळे,शिवाजी आडसूळ,हणमंत कस्पटे,सचीन गंभिरे,पंडित गोडगे, सुरेश कवडे आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!