कळंब- राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाची राज्यस्तरीय बैठक नुकतीच प्रदेशाध्यक्ष अनिल नाचपल्ले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. राज्यातील पंचवीस हजार शिक्षकांना अतिरिक्त ठरवत गोरगरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवणारा,खाजगी शाळांना डोकी मोजुन तर सरकारी शाळांना आधार कार्ड अपडेट वर पट निर्धारण करत दुजाभाव निर्माण करणारा हा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा अशी एकमुखी मागणी सर्वानुमते करण्यात आली.शिक्षक आणि शिक्षणाचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी राज्य स्तरावर प्रदेशाध्यक्ष अनिल नाचपल्ले व राज्य सरचिटणीस संतोष भोजने यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघ या संघटनेला शासन मान्यता मिळाली असुन ओबीसी शिक्षकांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी हे स्वतंत्र विचारपीठ निर्माण करण्यात आल्याचे यावेळी अनिल नाचपल्ले यांनी सांगितले.राज्य सरचिटणीस संतोष भोजने यांनी प्रास्ताविक करताना ओबीसी समाजातील अनेक कर्तृत्ववान समाज बांधवांना चळवळीत काम करत असताना अनेक वेळा संधी उपलब्ध असुनही योग्य ते स्थान मिळत नसल्याने बहुजनांची एकमेव संघटना म्हणून महाराष्ट्रात काम करावे असे आवाहन केले.ज्या शिक्षक बांधवांना बहुजन विद्यार्थी समाज शिक्षण याबाबत काम करायचे आहें आशांना या संघात संधी उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले.नाशिकहुन प्रशांत शेवाळे आणि राजेंद्र खैरनार यांनी शिक्षक संघटनेत काम करत असताना येणाऱ्या अडचणी संदर्भात सखोल मार्गदर्शन केले.बिंदुनामावली, पदोन्नती,शिक्षक भरती,यात संख्येनुसार ओबीसी समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत आणि सक्तीचे करण्यात यावे, शिष्यवृत्तीत वाढ करण्यात यावी, प्रोत्साहन भत्ता देऊन शिक्षणाच्या प्रवाहात आणावे यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करण्यात यावे असे लातूर येथील हिरालाल पाटील व संजय मळभागे यांनी सांगितले.ओबीसी समाजाला सन्मानाची वागणूक मिळवायची असेल तर प्रत्येकाने दुसऱ्याची गुलामगिरी झुगारून दिली पाहिजे असे हिंगोली जिल्हाध्यक्ष लहू राक्षे यांनी सांगितले.नविन संघटना स्थापन केल्याबद्दल राज्य भरातील शिक्षक बांधवांनी पदाधिकार्यांचे स्वागत केले. या सभेला प्रदेशाध्यक्ष अनिल नाचपले,सरचिटणीस संतोष भोजने,महिला प्रदेशाध्यक्ष रेखाताई सुडे,उपाध्यक्ष सुखदेव भालेकर ,प्रदेश प्रतिनिधी राजेंद्र खैरनार,कार्याध्यक्ष बबनराव चव्हाण,कोषाध्यक्ष संजय भोईर,प्रसिद्धी प्रमुख सचिन गडपतवार,लहू राक्षे हिंगोली जिल्हाध्यक्ष,हिरालाल पाटील लातूर जिल्हाध्यक्ष,गणेश आवचार छत्रपती संभाजी जिल्हाध्यक्ष,यांच्यासह नानासाहेब कवडे,बालाजी माळी,जिल्हाध्यक्ष अनंत फुलसुंदर,दिगंबर हुंडेकरी,सुरेश वाघमारे,विजय माळी,मच्छिंद्र बोकडे,हे धाराशिव हुन,मार्गदर्शक नेते लक्ष्मण दावणकर लातूर ,अर्जुन जाधव सांगली जिल्हाध्यक्ष,आदिनाथ जाधव,धनाजी घरत रायगड ,मनोज कुमार सोनवणे, नवनाथ काशीद,प्रशांत शेवाळे नाशिक,रघुनाथ कुंभार कोल्हापूर,संजय मळभागे मराठवाडासंपर्क प्रमुख,संतोष घुगे,संतोष रघुनाथ,शिवरुद्र घुगे परभणी,सुधाकर कोल्हे,सुरेश पांचाळ यवतमाळ,वनराज सूर्यवंशी,मारुती मलशेट्टे परभणी,नानासाहेब पाटील, प्रीती अरदक अमरावती,गोविंद लटपटे, गोरख आघाव रायगड, सुधाकर कोल्हे,संतोष केंद्रे, विनया जाधव,भागवत पदकोंडे, रंगनाथ सगर,अशोक ढाकणे जालना,धनंजय काकड,श्रीराम पळसकर पुणे,आदिनाथ जाधव पुणे,प्रशांत डिगोळे कोल्हापूर,मनोहर राठोड सोलापूर, नितीन गरजे सातारा,पंकज पाटील धुळे,जनार्दन केदार चंद्रपूर,सचिन ढोले नागपूर, दिलीप वानखडे बुलढाणा,संतोष सातव बुलढाणा,दत्तात्रय क्षीरसागर रत्नागिरी,दशरथ शृंगारे सिंधुदुर्ग,दिलीप इसामे ठाणे,संतोष चव्हाण रायगड,उमाकांत डिगे, रविभाऊ गुट्टे हिंगोली हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष भोजने यांनी तर आभारप्रदर्शन राजेंद्र खैरनार यांनी केले.
More Stories
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे
छत्रपती संभाजी विद्यालयात प्रवेश उत्सव उत्साहात साजरा