कळंब – गेल्या दहा दिवसापासून कळंब तालुक्यात अवकाळी पावसाने तांडव घातले असून त्यामुळे तालुक्यातील एकुरका येथील शेतकऱ्यांच्या विविध फळबागा जागेवरच जमीनदोस्त झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहेत . गेल्या दहा दिवसापासून कळंब तालुक्यात अवकाळी पावसाने तांडव गाजवले असून मंगळवार दि.२७ मे २०२५ रोजीपर्यंत २८१ मिली पावसाची नोंद झाली असून आजपर्यंतच्या अवकाळीची सर्वात मोठी नोंद मानली जात आहे.सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे एकुरका येथील शेतकरी दिलीप शिंदे यांच्या पाच एकरावरील शेतातील टरबुजाचे पीक पूर्णपणे वाया गेले आहे.त्याचबरोबर श्रीकांत भिसे यांच्या शेतातील पेरूचे चार एकर वरील फळ ही पूर्णपणे नासून गेले आहे तसेच प्रकाश घोगरे यांच्या शेतातील तीन एकर ऊस पूर्णपणे पाण्याने उध्वस्त झाला आहे.त्याचबरोबर किशोर घोगरे,राजेंद्र घोगरे यांच्यासह एकुरका येथील अनेक शेतकऱ्यांचे उसाचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोमवारी एकुरका येथे झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या फळबागा व इतर पिकांची पाहणे आ.कैलास पाटील यांनी केली असून कृषी अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनाम्या बाबत सूचना केली व शेतकऱ्यांनाही धीर दिला.
More Stories
ग्रामीण शिक्षणाचा प्रेरणास्त्रोत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे