कळंब – राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सव २०२५ च्या अनुषंगाने अहिल्यादेवींच्या जिवनावर आधारित चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.याला कळंब शहर व तालुक्यातील विविध शाळांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते गुरूवार दि २९ मे २०२५ रोजी जय भवानी फंक्शन हॉल, परळी रोड, कळंब येथे सकाळी ठिक ९-३० वा आयोजित करण्यात आला आहे. या बरोबरच एस एस सी परिक्षेत पैकीच्या पैकी म्हणजे १००% गुण मिळविणारे विद्यार्थी, निकालाची उज्वल परंपरा राखणा-या शाळा, विविध अभ्यासक्रमासाठी निवड झालेले विद्यार्थी, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती, क्रिडा क्षेत्रात मिळविलेले विषेश प्रावीण्य, ई चा सत्कार करण्यात येणार आहे. तरी गुणवंतांना प्रोत्साहित करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आयोजकां तर्फे आवाहन करण्यात आले आहे.
More Stories
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे
छत्रपती संभाजी विद्यालयात प्रवेश उत्सव उत्साहात साजरा