कळंब – तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दोघेही मानवतेच्या उद्धारासाठी कार्यरत असलेले महान विचारवंत होते. तथागत भगवान बुद्धांचे करुणा,अहिंसा व मध्यममार्गाचे तत्त्वज्ञान आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांचे समता,बंधुता, शिक्षण व सामाजिक न्यायाचे विचार हे आजच्या समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.या दोन महामानवांचे विचार केवळ धार्मिक किंवा सामाजिक मर्यादांपुरते न राहता,ते एक न्यायपूर्ण आणि समतामूल्य समाजरचनेसाठी दिशादर्शक ठरतात असे मत प्रा.जगदीश गवळी यांनी व्यक्त केले. कळंब तालुक्यातील भोसा येथे समतेचे युवा पर्व अंतर्गत भिम जयंती व बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित “गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्त्वज्ञान समजून घेताना “या विषयावर ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सौ.मंगलाताई विलास तौर या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून रमेश देशमुख, डॉ.संदीप तांबारे,मारुती देशमुख, कुंदन कांबळे,भगवान ओव्हाळ, विलास तौर,ॲड.खूने,प्रा. डॉ.समाधान चंदनशिवे,बबलू शेख ,इरफान शेख,हसन मुलानी , श्रीमान ,रोहित ताकपिरे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना प्रा.गवळी यांनी मूलभूत हक्क आणि कर्तव्य, विविध कलमानुसार घटनेमध्ये केलेल्या आरक्षणाच्या, शिक्षणाचा अधिकार यावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की शिक्षण हा परिवर्तनाचा मूलाधार असून, बाबासाहेबांनी दिलेला “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हा मंत्र आजही तितकाच प्रभावी आहे. तथागत गौतम बुद्ध,शिवराय ,फुले शाहू, आंबेडकरांचा खरा विचार हा शोषणमुक्तीचा होता हे समजून घेतलं पाहिजे असेही ते म्हणाले. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वक्तृत्व, निबंध ,सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ. प्रतिभा चंदनशिवे यांनी केले तर प्रास्ताविक व आभार प्रा.डॉ.समाधान चंदनशिवे यांनी मानले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी तुकाराम कदम, दत्तू कदम,प्रतीक शेरखाने,जीवन कदम,तोहित राजाभाऊ,तौर विनोद त्तौर ,नटराज शिरसाट, आरशाद शेख,तानू भाऊ तौर विनोद तौर हज्जू मिया शेख आदींनी परिश्रम घेतले.
More Stories
ग्रामीण शिक्षणाचा प्रेरणास्त्रोत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे